Marathi e-Batmya

धर्मा पाटील प्रकरणाचा अहवाल ८ दिवसात सादर करा

मुंबईः प्रतिनिधी

जळगावमधील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुक्य सचिवांकडून चौकशी केली जाणार असून येत्या आठ दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. धर्मा पाटील यांचे प्रकरण घडले तेव्हा मुख्यमंत्री डाव्होसच्या परिषदेच्या घाईत होते. त्यामुळे मंत्रालयात नेमके काय घडले याची पूर्ण कल्पना येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या घडामोडींची चौकशी करण्यास सांगितले आहे. नुकसानभरपाई देताना भेदभाव कसा झाला, कोणी केला, याला जबाबदार कोण, महापोर्टलवर नेमके काय झाले, या साऱ्याच घटनाक्रमाची चौकशी आता राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक करणार आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यावर येणाऱ्या निष्कर्षांनुसार जबाबदार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version