Marathi e-Batmya

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारकडून कठोर निर्णयाचे संकेत

औरंगाबादः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा इशारा देत कोरोनावर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रश्नी आपण उद्या मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध घालण्याचे संकेत त्यांनी दिले.

Exit mobile version