Marathi e-Batmya

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संसदेत, ५ पेक्षा जास्त वेळा तहकूब

सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या मोर्चाचे पडसाद संसदेत उमटले. त्यातच विद्यार्थी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संसदेत शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत केली.

राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मागणी करताच उपसभापतींकडून संसदेचे कामकाज स्थगित केले जात होते. तसेच विरोधकांकडूनही चर्चेची मागणी करण्यात येत होती. तर लोकसभेत विरोधकांकडून विद्यार्थ्यांवरील दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशीची मागणी आणि शिक्षण व्यवस्थेप्रश्नी चर्चेची मागणी करण्यात येत होती. तसेच यावरून विरोधकांकडून बॅनर पोस्टरही फडकावले जात होते.

त्यामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार स्थगित करण्यात आले, कारण विरोधी पक्षांनी नीट पेपर ‘लीक’ आणि राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली आणि फलक प्रदर्शित केले. सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

सहा माजी खासदारांच्या निधनावर शोकसंदेश वाचले जात असताना दोन सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने बिर्ला यांनी आक्षेप घेतला आणि हा चांगला पायंडा नाही असे म्हटले.

दुपारी १२ वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, गदारोळयुक्त विरोध सुरूच राहिला आणि सभागृहाचे कामकाज दुपारी १२:३० पर्यंत तहकूब करण्यात आले.

सभा कामकाज तहकूब होण्यापूर्वी, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, भारताच्या सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ३४ वरून ३८ पर्यंत वाढवणाऱ्या अध्यादेशाच्या जागी एक विधेयक सादर केले.

दुपारी १२:३० वाजताही असेच दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा अध्यक्षांनी शून्य प्रहर घेण्याची वारंवार केलेली विनंती विरोधी सदस्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यात अयशस्वी ठरली.

अध्यक्षस्थानी असलेल्या दिलीप सैकिया यांनी कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केले.

जवळपास राज्यसभा पाच ते सहा वेळा तर लोकसभा 4 ते 5 वेळा विरोधकांच्या गोंधळामुळे स्थगित करावे लागले. नंतर मात्र दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Exit mobile version