Marathi e-Batmya

अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा नवा दावा, भाजपाच फक्त मध्यमवर्गीयांची काळजी करते

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावली. त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत म्हणाले की, फक्त भाजपच देशातील मध्यमवर्गाचा काळजी करते आणि शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प “मोदींच्या हमी” पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी होता असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या निर्मितीसाठी, मी चार खांब मजबूत करण्याची हमी दिली. हे खांब शेतकरी, तरुण, गरीब आणि महिला आहेत. काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प मोदींच्या हमी पूर्ण होतील याची खात्री देतो. गेल्या काही वर्षांत, आम्ही गरिबांना मोफत रेशन, मोफत आरोग्य उपचार आणि पक्के घरे दिल्याचेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कालचा अर्थसंकल्प या देशातील लोकांसाठी अर्थसंकल्प होता. “भाजपा सरकार रस्ते, शाळा, रुग्णालये, पायाभूत सुविधा आणि इतर गोष्टींमध्ये या देशाचा पैसा गुंतवत असल्याचा दावाही यावेळी केला.

अर्थसंकल्पाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, वृत्तपत्रे अर्थसंकल्पाबद्दलच्या बातम्यांनी भरलेली आहेत, कारण हा अर्थसंकल्प जनतेचा आहे. गेल्या दशकात, भारताची अर्थव्यवस्था जगातील दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे, ज्यामुळे ते अधिक मजबूत होत आहे आणि नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे हे दिसून येते. जर परिस्थिती पूर्वीसारखी असती तर देशाच्या वाढत्या उत्पन्नाला घोटाळ्यांमुळे धोका निर्माण झाला असता अशी शक्यताही व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, देशाच्या मध्यमवर्गाने विकासात मोठे योगदान दिले आहे, मध्यमवर्गाचा आदर- काळजी करणारी आणि प्रामाणिक करदात्यांना बक्षीस देणारी ही एकमेव भाजपा असल्याचा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी तुमच्यासाठी एक चित्र रंगवतो. जर ते नेहरू सरकार असते आणि तुम्ही दरवर्षी १२ लाख रुपये कमवत असता, तर तुमच्या पगाराचा अंदाजे १/४ भाग सरकारकडे गेला असता. इंदिरा गांधी सरकारच्या काळात, तुम्हाला २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर द्यावा लागला असता. पण आता भाजपा सरकारमध्ये, वार्षिक १२ लाख रुपये कमावणाऱ्यांना सरकारला पैसे द्यावे लागणार नाहीत, अशी टीकाही काँग्रेसवर केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारे फक्त कराच्या पैशाने स्वतःची तिजोरी भरत होती. पण भाजपाला लोकांच्या दिलासाची काळजी होती.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी युवक आणि रोजगाराबद्दल बोलताना म्हणाले, विकसित भारतासाठी, आम्हाला आपल्या देशातील तरुणांची गरज आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पात, आम्ही त्यांच्यासाठी हजारो आणि कोट्यावधी रुपये बाजूला ठेवले आहेत आणि नोकऱ्या आणण्याचा प्रयत्न केला आहे. १२ लाख रुपयांपेक्षा कमी कर नसल्यामुळे दिल्लीत अनेक तरुण गिग कामगार म्हणून काम करत आहेत आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांमुळे या नोकऱ्या शक्य झाल्या आहेत. आणि आता भाजपा या गिग कामगारांची एका पोर्टलवर नोंदणी करण्याचा विचार करत आहे आणि त्यामुळे त्यांना विम्याचे फायदे यासह सरकारकडून अमर्याद फायदे मिळतील. मी पाहतोय की यामुळे ते आधीच आनंदी होत असल्याचा दावाही यावेळी केला.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) राजवटीवर हल्ला चढवत पंतप्रधान मोदी यांनी आम आदमी पक्षाला “आप-दा” (धोका) असे संबोधत म्हणाले की, दिल्लीतील जनतेसमोर पक्ष “उघडा” झाला आहे. “आप-दा पक्षाचे नेते पक्ष सोडत आहेत, कारण त्यांना माहित आहे की जनता आप-दा पक्षाचा द्वेष करते. आप-दा इतका धक्का बसला आहे की ते खोट्या घोषणांचा आधार घेत आहेत अशी टीकाही यावेळी केली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीकरांना भाजपाला एक संधी देण्याची आणि सत्तेत आल्यावर त्यांचा पक्ष त्यांच्या सर्व हमी पूर्ण करेल असे आश्वासन दिले.

Exit mobile version