Breaking News

सॅम ऑल्टमन यांचे भाकित, भाविष्य काळात व्याजदर २ टक्के पर्यंत घसरतील निखिल कामथ यांच्याबरोबरील मुलाखतीच्या कार्यक्रमात भाकित

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी भविष्यकाळात जिथे व्याजदर -२% पर्यंत घसरतील, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न प्रत्यक्षात येईल आणि एआय-व्युत्पन्न संपत्तीचे सार्वभौम संपत्ती निधी आणि प्रायोगिक चलनांद्वारे पुनर्वितरण केले जाईल. झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्याशी प्रामाणिक संवाद साधताना, ऑल्टमन म्हणाले की कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता (एजीआय) भांडवलशाहीचे नियम पुन्हा लिहिेल, समाजाला कुटुंब आणि …

Read More »

संसदेत नव्याने मंजूर झालेल्या आयकर कर विधेयकात पगारदार नोकरांसाठी तरतूदी काय? देशात १ एप्रिल २०२६ पासून होणार लागू

लोकसभेने व्यक्ती आणि कुटुंबांसाठी विद्यमान कर चौकटीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर (क्रमांक २) विधेयक, २०२५ मंजूर केले आहे. विरोधकांच्या निषेधादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या हालचालीचे नेतृत्व केले. हा कायदा प्रचलित प्राप्तिकर कायदे सोपे आणि एकत्रित करण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्याचे वैयक्तिक पगारदार करदात्यांसाठी महत्त्वपूर्ण परिणाम आहेत. संसदेने मंजूर …

Read More »

रशिया दौऱ्यात भारत रूपयांच्या मुल्याचा मुद्दा उपस्थित करणार वाणिज्य मंत्रालयाचे एक पथकही जाणार रशियाच्या दौऱ्यावर

पुढील आठवड्यात रशियाला जाणारे एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ रुपयाच्या मूल्याच्या व्यापाराचा मुद्दा उपस्थित करेल, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या मॉस्को दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळात वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक टीम सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रुपया व्यापार यंत्रणा कशी पुढे नेऊ शकेल यावर …

Read More »

भारतीय अर्थवस्थेबाबत एस अँड पी ग्लोबलने रेटिंगमध्ये केल्या सुधारणा बीबीबी- वरून बीबीबी अशी सुधारीत केली रेटींग

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने भारताच्या सार्वभौम रेटिंगमध्ये सुधारणा केल्याने देशाच्या मॅक्रो-इकॉनॉमिक मूलभूत गोष्टींना बळकटी मिळाली आहे आणि विशेषतः अमेरिकेने भारतावर ५०% कर लादले आहेत अशा वेळी हे महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक रेटिंग एजन्सीने गुरुवारी भारताच्या दीर्घकालीन अनपेक्षित सार्वभौम क्रेडिट रेटिंगला ‘BBB-‘ वरून ‘BBB’ असे स्थिर दृष्टिकोनासह अपग्रेड केले, देशाच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, बंच ऑफ थॉटला अभिप्रेत असा जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून होळी केली

देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या चिप मिनिस्टरला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहे आणि त्यासाठीच गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉटला अभिप्रेत भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा सर्व खटाटोप केलेला आहे, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, …पण सुनावणी नाही, तर बतावणी कधी होणार? लक्ष भरकटवण्यासाठी कुत्र्याचा प्रश्न, कबुतराचा प्रश्न

शिवसेना पक्ष फुटीनंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी घेत निर्णय दिलेला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता पुन्हा नव्याने निवडणूका होत पुन्हा राज्यात महायुती सरकार स्थानापन्न झाले. तरीही शिवसेना पक्षफुटीवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला नाही. फक्त तारीख पे तारीख …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे ८ दिवसांत एसआयटी स्थापनेचे आदेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद, राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे …

Read More »

सचिन सावंत यांची राज्य सरकारवर टीका, मनोरंजक निर्णय पशुवाहतूकी विरूद्ध फक्त पोलिसच कारवाई करू शकतात, नागरिक तक्रार करू शकतात

कुरेशी समाजाने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत मनोरंजक निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे बेकायदेशीर पशुवाहतूकीविरुध्द केवळ पोलिसच कारवाई करु शकतात.  दुसरीकडे नागरिक तक्रार करु शकतात असेही म्हणतात. याचा अर्थ वाहतूक थांबवण्याचा किंवा तक्रारी व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करु शकणार नाहीत. पण पोलिसांव्यतिरिक्त जर कोणी व्यक्ती किंवा संस्था तक्रारी व्यतिरिक्त इतर …

Read More »

सुनिल तटकरे यांचा दावा, लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागा विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे - सुनेत्रा पवार

लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवण राष्ट्रवादी …

Read More »