Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

आकाश फुंडकर यांचे निर्देश, आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा

राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात.  यासाठी ‘कर्मचारी राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा लाभ शेवटच्या कामगारापर्यंत पोहचविण्यात यावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. राज्यातील विमाधारक कामगारांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य सुविधांचा विस्तार आणि जनजागृतीवर करण्याच्या सूचनाही मंत्री फुंडकर यांनी …

Read More »

शरद पवार म्हणाले की, मोदी यांनी सर्वपक्षिय बैठक बोलवावी

मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण ही मोदी भाजपाची स्थिती

राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर नेल्या गेल्या असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून …

Read More »

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संयुक्त समितीची बैठक घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अंमलबजावणी अहवाल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लिक करणारे मोकाट

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. भाजपा सरकारला एक परिक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही अशी अवस्था झाली. NEET चा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे.  भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे. …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण पुनरुज्जीवित करा

बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ करण्याच्या तयारीत असताना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून शुल्कवाढ करण्यापूर्वी विद्यमान पार्किंग धोरणाचा आढावा घेण्याची आणि बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण (एमपीए) पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली. पार्किंगला महसूल मिळवण्याचे साधन मानण्याऐवजी वाहतूक शिस्त …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिले लाल बहादूर शास्त्री यांचे उदाहरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात …

Read More »

सुपर ३० चे संस्थापक आनंद कुमार म्हणाले, परिक्षा प्रणाली चीनप्रमाणे अधिक मजबूत करा

NEET-UG २०२६ परीक्षा कथित अनियमिततांमुळे रद्द करण्यात आल्यानंतर, ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी मंगळवारी कोचिंग सेंटर्सवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची आणि परीक्षा प्रणालीमध्ये अधिक मजबूत सुरक्षा उपाय अंमलात आणण्याची मागणी केली. स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात वारंवार उद्भवणाऱ्या वादविवादांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्ची होते, असे त्यांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने …

Read More »

राहुल गांधी यांची खोचक टीका, परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (१२ मे, २०२६) नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनले असल्याची टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने “या भ्रष्ट भाजप राजवटीने चिरडून टाकली …

Read More »

पेपर फुटीमुळे एनटीएने नीट युजी परिक्षा केली रद्द

पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर राहुल गांधी यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या या आवाहनाला त्यांनी ‘अपयशाचा’ पुरावा म्हटले आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्यास सांगितले—सोने खरेदी करू …

Read More »

राज्यातील ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र

राज्यातील लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतून दरमहा दिड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रथम ही योजना सुरू केली त्यावेळी सरसकट सर्व १८ ते ६५ वयोगटातील बहिणींना सरकारने माहे दिड हजार देण्याचे धोरण आखले त्याचा गाजावाजा भरपुर झाला. पण तिजोरीवर ताण येताच सरकारने छाननी सुरू केली. या योजनेचा …

Read More »

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा खोचक सवाल, यात मोदीजी येतातच कुठे ?

सोमवार दि. ११ मे रोजी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार / पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ७५ वर्षांपूर्वी, गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते.  अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल त्यांनी व्यक्त केला.  इतकेच नव्हे तर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष शेलार यांचा परदेश दौरा केला रद्द

  देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार …

Read More »