Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

इराणच्या विरोधातील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या प्रति बॅरलची किंमत ११० डॉलर्सपेक्षा जास्त

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात संघर्षामुळे तेलाच्या बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत. वाढत्या संघर्षावर व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मध्य पूर्वेकडून होणारी …

Read More »

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार

शिष्यवृत्तीधारक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल करू नये, यासाठी राज्य सरकार लवकरच शासन निर्णय  निर्गमित करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात आमदार योगेश सागर  यांनी राज्यातील शासकीय व मान्यता प्राप्त वैद्यकीय मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील  मुलींना शिक्षण …

Read More »

आशिष शेलार यांचे आश्वासन, राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींच्या परीक्षा शुल्कासंदर्भात समिती मार्फत निर्णय

राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील तसेच केंद्र शासनाच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलतीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री …

Read More »

माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता

मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला. राज्यमंत्री माधुरी …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती

राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत, या संदर्भात निर्णय घेतला जाणार असून, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच …

Read More »

वांगणी येथील रुग्णालयात अप्रमाणित औषध खरेदी प्रकरणी विभागीय चौकशी

ठाणे जिल्ह्याच्या वांगणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बुरशी लागलेली औषधे आढळल्याप्रकरणी खरेदीशी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करुन दोषी आढळल्यास त्यांचे निलंबन करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य किसन कथोरे यांनी सहभाग घेतला. आरोग्य …

Read More »

आशिष शेलार यांचे मत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित “खंजिरीचे बोल” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यात अॅड शेलार बोलत होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भांडवली बाजारातील ‘ बॉण्ड’च्या माध्यमातून विकासाला निधीचे बळ

महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे ‘ इनोव्हेटिव्ह फंड’  निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘ रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश …

Read More »

शेतकऱ्यांचे ७/१२ कोरा करण्याच्या मागणीप्रश्नी विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन

राज्याच्या बजेट सत्राच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवार को विधानभवनाच्या उत्तरात तीव्र राजकीय राजकारणाशी झाली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. या विरोधकांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणाला पूरेसे नसल्याची टीका केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी “शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे” असे नारे लागवत सरकारने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन कृतीशील

जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन कृतीशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मीरा-भाईंदरजवळील उत्तन येथे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती

पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंटला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टॅलेंट हंट अभियानांतर्गत नाव नोंदणी केल्यानंतर आज प्रत्यक्ष विभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. राज्यातील सर्व विभागात या मुलाखती घेण्यात आल्या. या अभियानामधून पक्ष प्रवक्ते, मीडिया पॅनेलिस्ट, संशोधन समन्वयक आणि प्रसिद्धी समन्वयक या पदांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना काँग्रेस …

Read More »

खामेनींचे सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांचा इशारा, डोनाल्ड ट्रम्प यांना किंमत चुकवावी लागेल

इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी तेहरान “आमच्या नेत्याच्या रक्ताचा” बदला घेईल अशी शपथ घेतली आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की मध्य पूर्वेतील अमेरिका-इराण-इस्रायल युद्ध तीव्र होत असताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येची “किंमत चुकवावी लागेल”. लारीजानी यांच्या या वक्तव्यावर ट्रम्प यांनी …

Read More »

पंतप्रधान यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी तो फोटोच आरसा म्हणून दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्या अलिकडच्या राज्य दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा “अपमान” केल्याचा आरोप केल्यानंतर रविवारी केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारमधील राजकीय वाद आणखी तीव्र झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या एका कार्यक्रमातील एक छायाचित्र शेअर करून प्रत्युत्तर दिले. या छायाचित्रात राष्ट्रपती उभे असताना पंतप्रधान …

Read More »