Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात

नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा येथून ४१ जण आज परतले असून १०६ जण नागपूरला उद्या पहाटे …

Read More »

राहुल गांधी यांची मागणी, हल्दवानी प्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा

हल्दवानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रॅलीच्या ठिकाणी कथित ‘शुद्धीकरण’ विधीवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या वळणावर पोहोचला आहे. काँग्रेसने दलितांविरुद्धच्या भेदभावावरून भाजपावर आरोप सुरु केले आहेत. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांविरुद्ध ‘अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ (SC/ST Act) अंतर्गत गुन्हा (FIR) …

Read More »

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले. बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जालन्यात बैल विक्रीच्या आरोपातून दलित तरूणाला शेण खायला लावल्याचा संतापजनक प्रकार

जालन्यात दलित तरुणावर बैल विक्रीचा आरोप करत मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि त्याला शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे, त्याच्या ११ वर्षांच्या मुलालाही अशीच अमानुष वागणूक देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, …

Read More »

उच्च न्यायालयाने एफडीएला प्रश्न उपस्थित करताच, सिप्ला विरोधातील आदेश घेतला मागे

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरिंग अँड फॉरवर्डिंग (सी अँड एफ) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आपला आदेश मागे घेतला. मुंबई उच्च न्यायालयाने नियामक संस्थेवर “अतिरेक” आणि “मनमानी” पद्धतीने वागल्याचा आरोप केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …

Read More »

आरक्षण धोरण आढाव्यानंतर चिराग पासवान यांनी जीतन राम मांझी यांचा मागितला राजीनामा

एनडीए सरकारमध्ये एकाच मुद्द्यावरून दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये मतभेद होणे हे एक दुर्मिळ दृश्य आहे. शनिवारी, हिंदूस्तानी अवामी मोर्चा एचएएम (सेक्युलर) पक्षाने आरक्षण धोरणाचा आढावा घेण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी त्यांचे सहकारी जीतन राम मांझी यांचा राजीनामा मागितला, ज्यामुळे एनडीएमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. दिल्लीतील जंतर मंतर …

Read More »

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळला आतापर्यंत ४.९ अब्ज रुपयांची मदत

नेपाळमधील सार्वजनिक क्षेत्र, खाजगी कंपन्या आणि व्यक्तींनी आपत्ती निवारण निधीसाठी लाखो रुपयांचे योगदान देण्याचे वचन दिले आहे, कारण देश आतापर्यंतच्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एकाचा सामना करत आहे, ज्यामध्ये ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही देणगी अशा वेळी आली आहे, जेव्हा अधिकारी जखमींना मदत करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात …

Read More »

नेपाळच्या पुरातील मृतांचा आकडा ६२६ वर बेपत्ता नागरिकचा आकडा दोन हजारावर

नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ६२६ लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि शनिवारी बचाव पथके वेळेच्या विरोधात शर्त करत शोध आणि मदत कार्य सुरू ठेवत होती, कारण अधिकाऱ्यांनी बाधित भागात ताज्या पावसाचा आणि वादळी पावसाचा इशारा दिला होता. हवामानाच्या या धोक्यामुळे बचाव कार्यात व्यत्यय येण्याची चिंता वाढली आहे, या संकटात जवळपास २,००० …

Read More »

एफएसएसएआयची एव्हरेस्ट मसाले आणि लालजी गोधूला नोटीस

प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये उत्पादने निकृष्ट दर्जाची आढळल्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स आणि लालजी गोधू यांनी उत्पादित केलेल्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर प्रमुख हिंग ब्रँड्सवर बाजार देखरेख सुरू केल्याचे एफएसएसएआय FSSAI ने सांगितले. त्यानंतर, कंपन्यांच्या मुंबईतील उत्पादन युनिट्समधून आणि गुजरातच्या …

Read More »

शीख दंगलीतील प्रमुख आरोपी सज्जन कुमार यांच्या कुटुंबियांच्या सात्वनासाठी भाजपाचे तीन खासदार

१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीतील गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांच्या निधनानंतर, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी भेट देणाऱ्या दिल्लीतील भाजपच्या तीन खासदारांना पक्षाचे अध्यक्ष नितीन नबिन यांनी फटकारले आहे. कमलजीत सहरावत, रामवीर सिंग बिधुरी आणि योगेंद्र चंडोलिया या खासदारांनी अलीकडेच कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची …

Read More »

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा (JMFC व CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असलेला वकिलीचा अनुभव (Law Practice) तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात भरीव वाढ

उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले, तर कडधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. शेतकऱ्यांचा बियाणे वापर वाढावा आणि कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवावी, यासाठी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन …

Read More »

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले …

Read More »

गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून गणेशोत्सवाच्या काळात आवश्यक असणारे किराणा साहित्य सवलतीच्या म्हणजेच अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती केली आहे. …

Read More »