Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा

भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर …

Read More »

आसाममध्ये ८५.०४ टक्के, तर केरळमध्ये ७७.३८ मतदान

गुरुवारी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये दिवसभर मतदानाला वेग आला, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीनुसार जोरदार सहभाग दिसून आला. अधिकृत आकडेवारीनुसार, पुदुचेरीमध्ये सर्वाधिक ८९.०८ टक्के, त्याखालोखाल आसाममध्ये ८५.०४ टक्के, तर केरळमध्ये ७७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील सर्व १२६ विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ८५.०४ टक्के मतदानाची नोंद …

Read More »

अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांची युरोपियन मित्र राष्ट्रांना होर्मुजवरून दिला शेवटचा इशारा

अमेरिका आणि इराण यांच्यातील नाजूक युद्धविरामाने मुत्सद्देगिरीसाठी एक छोटी संधी निर्माण केली आहे. आता वॉशिंग्टन आपल्या युरोपीय मित्र राष्ट्रांवर जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला सुरक्षित करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचा दबाव आणत आहे. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि किमतींवर दबाव आल्याने, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हे स्पष्ट …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला

दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. त्यामुळे ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का? नकार दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुप्रिया …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, डीपीटी लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द करा

डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द तात्काळ रद्द करण्यात यावा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. जयंत पाटील आपल्या पत्रात म्हटले आहेत की, मुंबईच्या हाफकिन बायो फार्मास्यूटिकल कॉर्पोरेशनचे लसीकरणात फार …

Read More »

जयकुमार रावल यांचे आश्वासन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा, सोबतच सामान्य ग्राहकांचे हितही जपले जावे, यासाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी कांदा प्रक्रिया व साठवणुकीच्या उपाययोजनांवर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध

म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सहा आश्वासने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या जनतेला सहा आश्वासने दिली, तसेच राज्यातील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि ढासळत्या कायद्याच्या राज्यावरून तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. २३ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या हल्दिया येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी, पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यास कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे, प्रशासनात पारदर्शकता आणण्याचे, भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करण्याचे, …

Read More »

अमेरिका-इराण युद्धबंदी दरम्यान लेबनॉनच्या संभ्रमास पाकिस्तान जबाबदार

८ एप्रिल, २०२६ हा पाकिस्तानसाठी आनंदाचा दिवस होता. कारण, अमेरिका-इराण शस्त्रसंधीमध्ये मध्यस्थी करून पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठा राजनैतिक विजय मिळवला होता. तथापि, काही तासांतच, इराणचा मित्र असलेल्या लेबनॉनवर इस्रायलने सर्वात मोठा हल्ला केल्याने शस्त्रसंधीवर ताण आला, ज्यात शेकडो लोक मारले गेले. संभ्रम – लेबनॉन शस्त्रसंधीचा भाग होता की …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, सभ्यता, सुसंस्कृतपणा विचारात घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा …

Read More »

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपटास मान्यता

कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे …

Read More »

आशिष जयस्वाल यांची माहिती, पारंपरिक पुजाऱ्यांसाठी राज्यस्तरीय सर्वसमावेशक धोरण लवकरच

राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्क व संरक्षणासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या सन्मान व उपजीविकेची हमी देणारे सर्वसमावेशक राज्यस्तरीय धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस धर्मादाय आयुक्त एस. एस. कलोती, विधी व न्याय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी अंमलबजावणीवर भर द्यावा

राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर दरडोई  उत्पन्नात  महाराष्ट्राला अग्रेसर  राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या “विकसित महाराष्ट्र 2047” या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत २०३० पर्यंत मोजता …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, राज्यात ‘हब आणि स्पोक मॉडेल’ द्वारे अवयवदान व प्रत्यारोपण चळवळ व्यापक करा

महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात अवयव प्रत्यारोपण उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ …

Read More »