Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, मतदार यादीत घोळ करणा-यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती गडचिरोली ते मुंबई उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाला गती

“विकसित भारत २०४७” च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान दळणवळण, कौशल्य विकास, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या व्यापक विकास आराखड्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे

राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर …

Read More »

एस. चोकलिंगम यांची माहिती, मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे विशेष सखोल मतदार पुनरिक्षण करण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आपत्ती व्यवस्थापनासाठी एआय आधारित ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करा

राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व  आपत्ती व्यवस्थापनाबाबत …

Read More »

सहाय्यक गट विकास अधिकारी आणि उपलेखापाल पदांसाठी २५ मे पासून विभागीय परिक्षा

महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींना संबंधित पदावर कायम करण्यासाठी, तसेच जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावरील पदोन्नती व नामनिर्देशनासाठीच्या विभागीय परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालय (आस्थापना) यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. या परीक्षा दि. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथिगृहात केलीत्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

छगन भुजबळ यांची माहिती, पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना छगन …

Read More »

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका, घरी बोलावून मंत्री केलं ही चूक

गत महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना घरी बोलावत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. तसेच बच्चू कडू यांचा योग्य तो सन्मान राखला असे असतानाही शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री पदाची पर्वा न करता एकनाथ शिंदे यांची साथ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप, युनिकॉनची राजधानी

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही.  नवीन उद्योग,  तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदींच्या या कृतीमुळे इटलीने पेट्रोल-डिझेलची जहाजे रोखल्याने इंधनाचा तुटवडा

पंतप्रधान मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले ४ जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास ८०० टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून …

Read More »

तीव्र उष्णतेच्या झळांच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन?

भारताचा मोठा भाग तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त असताना आणि रात्रीच्या वेळीही तापमान असामान्यपणे जास्त असताना, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या उपग्रह प्रतिमांमधून उत्तर भारताकडे एक मोठी पश्चिमी प्रणाली येत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे बहुप्रतिक्षित पावसाची आणि या भाजून काढणाऱ्या तापमानापासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. INSAT-3DS हवामान उपग्रहाने …

Read More »

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईड हमजा बुरहानची अज्ञाताकडून हत्या

पाकिस्तानमध्ये पुन्हा अज्ञात व्यक्ती कार्यरत? २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील एका सूत्रधाराला, ज्यामध्ये ४० हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठार केले. पुलवामाचा रहिवासी, ‘डॉक्टर’ म्हणून ओळखला जाणारा हमजा बुरहान याला २०२२ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. बुरहान, ज्याचे मूळ नाव …

Read More »

कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय, बैल, गायी, म्हशीच्या कत्तलीच्या अधिसूचनेत हस्तक्षेप करण्यास नकार

पुढील आठवड्यातील ईद-उल-अझहाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने बैल, वळू, गायी, वासरे आणि म्हशींच्या कत्तलीवर निर्बंध घालणाऱ्या अलीकडील अधिसूचनेत हस्तक्षेप करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. १३ मे रोजीची अधिसूचना ही केवळ २०१८ मध्ये न्यायालयानेच दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुजॉय पॉल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा

यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष …

Read More »