Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

इराणची युद्धनौका श्रीलंकेच्या समुद्रात अमेरिकेच्या पाणबुडीने बुडविली

श्रीलंकेजवळील हिंदी महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने इराणी युद्धनौकेवर हल्ला करून बुडाल्याने किमान ८० जणांचा मृत्यू झाला, असे देशाच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांनी बुधवारी स्थानिक टेलिव्हिजनवर सांगितले. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर अमेरिकन पाणबुडीने हल्ला केल्याची पुष्टी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी यापूर्वी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस …

Read More »

दादाजी भुसे यांची माहिती, शाळांच्या सुविधा उभारणीसाठी विविध स्रोतांतून निधीचा प्रभावी उपयोग

राज्यातील शाळांची भौतिक सुविधा सुधारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, तसेच मनरेगा अंतर्गत कंपाऊंड वॉलसारखी कामे करता येतात. जिल्हा परिषदेचा सेस निधी, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था, गौण खनिज निधी, सीएसआर आणि लोकसभा निधी या माध्यमांतूनही शाळांमधील सुविधा उभारल्या जात आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत उपस्थित लक्षवेधीचे उत्तर …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बिनशेती झालेल्या मिळकतींवर अकृषिक कर रद्द

राज्यातील बिनशेती झालेल्या मिळकतींवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आकारण्यात येऊ नये, असा निर्णय १० फेब्रुवारी २०२६ च्या सुधारित निर्णयानुसार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. तथापि, २००१ पूर्वी झालेल्या रुपांतरणासाठी तेव्हाच्या रेडी रेकनरनुसार एकरकमी रुपांतरण अधिमूल्य आकारण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन

Nagpur Blast

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि कामगारांचे जीव सुरक्षित राहतील. २००८ मध्ये तयार झालेल्या स्फोटक कारखान्यांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. महाराष्ट्र विधान परिषद नियम …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल

हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या शोध मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी ते पाहतात. या विशेष सेलने केलेल्या कामामुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या …

Read More »

भाजपाकडून या चार जणांना आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

राज्यसभेवर निवडूण गेलेल्या सात जणांची मुदत नुकतीच संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या सात जागांपैकी चार जागांसाठी भाजपाने उमेदवार जाहिर केले. यापैकी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी आमदार रामरावजी वडकुते आणि मायाताई चिंतामण इवनाते यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केली आहे. सात जणांपैकी राज्यसभेवर महाराष्ट्रातून …

Read More »

गणेश नाईक यांचे आश्वासन,बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बांबू उत्पादन, प्रक्रिया आणि बाजारपेठ निर्मितीद्वारे ग्रामीण व आदिवासी भागात रोजगारनिर्मिती करण्यावर सरकारचा भर आहे. तसेच शेतकरी व आदिवासी बांधवांना बांबू निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना मॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्यातील २७१ डेपो सार्वसनिक-खासगी सहभागातून विकसित होणार

राज्यातील २७१ परिवहन डेपो सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत दोन ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील डेपो अशा तीन डेपोचे एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आखाती देशात अडकलेल्या नागरीकांना परत आणणार

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत युद्ध पुकारले. या तीन चार दिवसांच्या कालावधीत अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात हवाई बॉम्ब हल्ले कायम ठेवले आहेत. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर म्हणून त्या दोन देशांसह जिथे जिथे अमेरिकच्या नौलाची थळ आहेत त्या ठिकाणावर बॉम्बहल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या आणि फिरायला गेलेले …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आता खूप उशीर झाला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणचे लष्करी नेतृत्व आणि प्रमुख संरक्षण क्षमता नष्ट करण्यात आल्या आहेत आणि चर्चेसाठी “खूप उशीर” झाला आहे असे वक्तव्य केले आहे, कारण त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलेल्या एका मत लेखात केलेल्या भाष्याला विरोध केला. “त्यांचे हवाई संरक्षण, हवाई दल, नौदल आणि नेतृत्व गेले …

Read More »

इराणच्या नतान्झच्या अणुप्रकल्पावर बॉम्बहल्ला, आयएईएची पुष्टी

अमेरिका-इस्रायली लष्करी हल्ल्यांचा भाग म्हणून इराणच्या नतान्झ येथील भूमिगत आणि पूर्वी बॉम्बहल्ला झालेल्या युरेनियम-संवर्धन प्रकल्पाच्या प्रवेशद्वारांवर हल्ला करण्यात आला आहे, अशी पुष्टी संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांनी मंगळवारी (३ मार्च २०२६) केली. गेल्या जूनमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणी अणु सुविधांवर हल्ला केला तेव्हा इराणच्या तीन युरेनियम-संवर्धन प्रकल्पांपैकी एक भूमिगत इंधन-संवर्धन प्रकल्प …

Read More »

दुबईत अडकलेल्यांना मराठी जनांना विशेष विमानाने मुंबईत परत आणणार

दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने पाठवली असून सायंकाळपर्यंत सर्व सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धुलीवंदनाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती जाहीर केली. धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना …

Read More »

इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांच्या हत्येवर शांतता, देशाच्या परराष्ट्र धोरणावर शंका

मोदी सरकारवर कडक टीका करताना, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी (३ मार्च २०२६) म्हटले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या लक्ष्यित हत्येवरील त्यांचे मौन तटस्थ नसून ते पदत्याग आहे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेने आणि विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित करते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी अशीही मागणी …

Read More »

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या ७८० हून अधिक जणांचा मृत्यू

पश्चिम आशियातील युद्ध तीव्र होत असताना, अमेरिका आणि इस्रायलने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ले सुरू केल्यापासून आतापर्यंत इराणमध्ये ७८० हून अधिक लोक मारले गेले आहेत, असे इराणी रेड क्रेसेंटने म्हटले आहे. मंगळवारी (३ मार्च २०२६) इराण आणि इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या बॉम्बहल्ल्या आणि सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला …

Read More »