Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा (JMFC व CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असलेला वकिलीचा अनुभव (Law Practice) तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात भरीव वाढ

उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले, तर कडधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. शेतकऱ्यांचा बियाणे वापर वाढावा आणि कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवावी, यासाठी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन …

Read More »

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले …

Read More »

गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून गणेशोत्सवाच्या काळात आवश्यक असणारे किराणा साहित्य सवलतीच्या म्हणजेच अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती केली आहे. …

Read More »

कर्नाटक मंत्रिमंडळातील मंत्री बी नागेंद्र यांचा राजीनामा

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपकडून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी संध्याकाळी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा करताना अश्रू ढाळले. आपला निर्णय जाहीर करताना नागेंद्र यांनी दावा केला की, ते दलित असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. मंत्री बी नागेंद्र पुढे बोलताना म्हणाले की, वाल्मिकी व्यवहारात …

Read More »

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा आरोप, कर्नाटकने दोन शिक्षकांना आरएसएससोबत असल्याने केले निलंबित

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी कर्नाटक सरकारवर आरएसएसच्या रूट मार्चमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोन सरकारी शाळेतील शिक्षकांना निलंबित करून ‘द्वेषाने’ काम करत असल्याचा आरोप केला आणि ही कारवाई मागे घेण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डी के शिवकुमार सरकारच्या प्राधान्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कर्नाटक लोकसेवा आयोगातील मोठ्या …

Read More »

नेपाळने भारत, चीन आणि अमेरिके सारख्या देशांची मदत नाकारली

भोटे कोसी येथील विनाशकारी पुरानंतर बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोध आणि बचावासाठी हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षित पथके तैनात करण्याच्या भारत, चीन आणि इतर अनेक देशांच्या प्रस्तावांना नेपाळने नकार दिला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हटले आहे की, त्यांच्या सुरक्षा यंत्रणा बचाव कार्य करण्यास सक्षम आहेत आणि शेकडो बेपत्ता परदेशी नागरिकांशी …

Read More »

नेपाळच्या पुरात आतापर्यंत ५६७ जणांचा मृत्यू १५०० नागरिक अद्यापही बेपत्ता

नेपाळमधील विनाशकारी अचानक आलेल्या पुरानंतर वाचलेल्यांना शोधण्याच्या धडपडीत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे, कारण नेपाळ-तिबेट सीमेजवळ नव्याने तयार झालेले सरोवर ओसंडून वाहू लागले आहे आणि त्यामुळे दुसऱ्या प्राणघातक लाटेचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी मध्य नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर किमान ५८७ लोकांचा मृत्यू झाला आहे …

Read More »

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र “बिलॉंन्गिंगः…” प्रसिद्ध करण्यास पेग्विंनचा नकार

प्रकाशकाने सुचवलेले संपादकीय बदल आणि काही भाग वगळण्याची विनंती काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी फेटाळल्यामुळे ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने त्यांचे बहुप्रतिक्षित आत्मचरित्र प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला, अशा बातम्यांचे कंपनीने खंडन केले आहे. शनिवारी आपल्या ‘एक्स’ (X) पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, प्रकाशन संस्थेने स्पष्ट केले की ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ …

Read More »

पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदींनुसार पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता व नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या नियमांनुसार पंचायत समितीमध्ये नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या सदस्यांची संख्या संबंधित पंचायत समितीच्या एकूण निर्वाचित सदस्यसंख्येच्या …

Read More »

गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात

नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रशासनाकडे 80 लोकांची माहिती …

Read More »

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर

जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी

महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होण गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव-2026 निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात …

Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अ-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मराठी न आल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. ऑटो-टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुदतवाढीची विनंती …

Read More »