Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजकां आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला आरक्षण विधेयकावरून भाजपा व मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिशाभूल

वर्षा गायकवाड

महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसापासून उपोषण, सरकार झोपले आहे का? मंत्र्यांची हकालपट्टी करा

राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे. राज्यातील भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली पण त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. या आदिवासी …

Read More »

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आदेश, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा सर्वंकष आराखडा तयार करावा

राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना  गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी राज्य राखीव पोलीस बलाचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे …

Read More »

जयकुमार गोरे यांचे निर्देश, जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त कराव्यात

आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्यात यावे. तसेच, शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्ग खोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत …

Read More »

अरविंद केजरीवाल यांचे भाजपाला खुले आव्हान, गुजरात आणि पंजाबमधील शाळांची तुलना करा

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी भाजपला पंजाब आणि गुजरातमधील १,००० शाळांची तुलना करण्याचे ‘खुले आव्हान’ दिले. त्यांनी असाही आरोप केला की, भाजप पंजाब सरकारच्या शाळांना बदनाम करण्यासाठी ‘बनावट, एआय व्हिडिओ’ वापरत आहे. एका व्हिडिओ संदेशात, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही तुलना संयुक्तपणे केली …

Read More »

धोतरा- बियांच्या ऑनलाईन विक्री प्रकऱणी कर्नाटककडून ॲमेझॉन, स्विगी, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केटचे परवाने रद्द

कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (FDA) विषारी धोतरा (धतुरा) फळे आणि बियांच्या ऑनलाइन विक्रीप्रकरणी ॲमेझॉन, स्विगी, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केट यांना जारी केलेले अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्लॅटफॉर्मवर धोतरा फळे आणि बिया अन्न आणि मानवी सेवनासाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे विभागीय चौकशीत आढळून …

Read More »

तृणमूल काँग्रेसच्या २० फुटीर खासदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि लोकसभा नेते अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर २० बंडखोर तृणमूल काँग्रेस खासदारांना नोटीस बजावली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रलंबित असलेल्या अपात्रता याचिकांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे निर्देश मागितले होते. मात्र, याचिकेत प्रथम प्रतिवादी म्हणून नाव असूनही, बिर्ला यांना कोणतीही …

Read More »

डीआरडीओचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांना हस्तांतरीत करण्यास राजनाथ सिंह यांची मान्यता

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेले सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचे तंत्रज्ञान देशांतर्गत उत्पादनासाठी भारतीय संरक्षण कंपन्यांना हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशाच्या संरक्षण परिसंस्थेमध्ये भारतीय उद्योगाची भूमिका विस्तारण्याच्या आणि प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींच्या अधिक स्वदेशी उत्पादनास सक्षम करण्याच्या दिशेने …

Read More »

अमेरिकेचे लष्करी विमान रशियाच्या व्नुकोवो विमानतळावर

मंगळवारी अमेरिकेचे एक लष्करी विमान रशियाच्या ‘व्नुकोवो’ (Vnukovo) विमानतळावर उतरले. युक्रेनमधील संघर्षामुळे वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यात तणाव असताना घडलेल्या या रहस्यमय लँडिंगमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विविध अहवाल आणि ‘फ्लाईट रडार’च्या माहितीनुसार, हे विमान बहुधा ‘बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३’ (Boeing C-17 Globemaster III) असावे; हे प्रामुख्याने अमेरिकन हवाई दलाद्वारे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे चार निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. त्यातील पहिला निर्णय हा क्रिडा विभागातील नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश करण्यात आला. याशिवाय नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल

देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे. त्याचेच उदाहरण ही ‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली आहे. ही प्रणाली गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक उत्तम यशोगाथा देशासमोर ठेवली असल्याचे गौरवोद्गारही काढले. …

Read More »

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया

वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाईन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात आले आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाईन परिवहन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील जळीतकांडाची सखोल चौकशी करून शिक्षा करा

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे. भंडाऱ्यातील रुग्णालयात असाच प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णलयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते, त्याचे काय झाले, कशा प्रकारे फायर ऑडिट करण्यात आले. या जळीत कांडांशी संबधितांची सखोल चौकशी करून दोषींना …

Read More »