Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

अभिजीत दीपके यांचा आरोप, आजही काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षा वाईट सुविधा

सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले की, योग्य वर्गखोल्या, बाक, शौचालये आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडले जात आहे. लातूरमधील एका जिल्हा परिषद शाळेला भेट देताना …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, …

Read More »

महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर ‘माडग्याळ’ प्रजातीच्या मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व अधिकृत प्रजाती (ब्रीड) म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील उमरडा या स्थानिक गोवंशाचे व माडग्याळ या मेंढी प्रजातीचे संवर्धन, जतन व आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने …

Read More »

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी …

Read More »

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण तलाव म्हणून याकडे पाहिले जायचे. अनेक वर्ष या तलावाने पिण्याचे पाणी नागपूर शहराला दिले. मध्यंतरी जलपर्णीने हा तलाव व्यापला होता. मात्र, महानगरपालिकेने जलपर्णी नामशेष करण्यासाठी प्रयत्न केले व ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. एक उत्तम …

Read More »

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या पुण्यात २२ ऑगस्टला राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई …

Read More »

गुलाबराव पाटील यांचे निर्देश, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवा

जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत मंत्री गुलाबराव …

Read More »

झीनत शबरीन यांची मागणी, नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधातील एफआयआर मागे घ्या

‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही धमक्या कमी झालेल्या नाहीत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे रियाला प्रचंड त्रास दिला जात आहे. रियाला धमकी देणाऱ्यांना अटक करावी व आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे गुन्हे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, वृद्ध पालकांसाठी मुलांना घर खाली करण्याचे आदेश देण्याचा अधिकार न्यायाधीकरणाला

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असा निर्णय दिला की, जर वृद्ध पालक आपल्या मुलांचा किंवा नातेवाईकांचा आदर आणि संरक्षण करण्यात अयशस्वी ठरले, तर ते त्यांना घरातून बाहेर काढण्याची मागणी करू शकतात. वाढत्या वयाचा अर्थ अपमान, दुर्लक्ष किंवा असुरक्षिततेत जगणे असा होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. लखनौचे रहिवासी रवी कांत गुप्ता यांच्या …

Read More »

शीख दंगलीतील प्रमुख आरोपी सज्जन कुमार यांचे तिहारच्या तुरुंगात वयाच्या ८० वर्षी निधन

१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी ८० व्या वर्षी निधन झाले. दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सज्जन कुमार यांना सफदरजंग रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण रुग्णालयाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. एक प्रभावशाली …

Read More »

चीन आणि भारताची आर्थिक गाडी एकच वेळी सुटली मात्र चीनचा वेग मंदावला तर भारताची थोडीशी गती शिल्लक

भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन देश एकेकाळी ‘आशियाई शतकाची जुळी इंजिने’ मानले जात होते. या दोन्ही देशांनी आपल्या आर्थिक प्रवासाचा आधुनिक टप्पा जवळपास समान उत्पन्न पातळीवरून सुरू केला होता, परंतु कालांतराने त्यांच्या विकासाचे मार्ग वेगळे झाले. १९८० च्या दशकापासून चीनने निर्णायक आघाडी घेतली आणि अनेक दशके …

Read More »

राजीव गांधी यांच्या जयंती दिनी राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट, आई सोनिया गांधी यांच्या अतुलनीय धैर्याचे कौतुक

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कौतुक केले. १९९१ मध्ये त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर, त्यांनी सोनिया गांधींना आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा “अखंड धैर्य आणि …

Read More »

दक्षिणेतील राज्यांचे मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्यात कावेरी, जीएसटी, डिलीमिटेशन आणि नीट

गुरुवारी तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘दक्षिण क्षेत्रीय परिषदे’च्या (Southern Zonal Council) बैठकीत दक्षिण भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation), दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व सुरक्षित ठेवणे, ‘नीट’ (NEET) परीक्षा, कावेरी पाणीवाटप आणि अधिक आर्थिक स्वायत्तता यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दक्षिणेकडील …

Read More »

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत शासनाने मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. संबंधित मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून, त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून, पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने २ जून …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा इशारा, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास बॅज निलंबित करणार

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक …

Read More »