Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक परीक्षा ६ सप्टेंबरला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेचा पेपर एक सकाळी ११ ते दुपारी १२ आणि पेपर दोन दुपारी ३ ते …

Read More »

शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटल प्रसिद्धीवर भर

महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पर्यटन संचालनालयामार्फत २०२६-२७ या वर्षातील जनसंपर्क विभाग आणि …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापणार

कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगाने होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गतिमान भूसंपादन करून महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक …

Read More »

विभागीय माहिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरीच नाही

कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतर राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असताना, अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालय, अमरावती येथे गेल्या तीन वर्षात बायोमेट्रिक हजेरी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत बायोमेट्रिक हजेरी अहवाल मागविण्यात आलेल्या माहितीतून हा भोंगळ कारभार उघड झाला असून, …

Read More »

अभिजीत दीपके म्हणाले, आगामी काळात विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लिसनिंग टूर

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही संघटना ‘दबाव गट’ म्हणून काम करेल आणि राजकारणात उतरण्याची त्यांची कोणतीही तात्काळ महत्त्वाकांक्षा नाही अशी माहिती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज दिली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीच्या दोन दिवसीय रणनीती बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलताना, अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचे …

Read More »

झारखंडचे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी सोनम वांगचूक यांच्या सूचनेनुसार उपोषण सोडले

झारखंडचे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो, जे जेपीएससी (JPSC), जेएसएससी सीजीएल (JSSC CGL) आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेवर कारवाईच्या मागणीसाठी ३ जुलैपासून अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत, त्यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर बुधवारी पाणी पीत उपोषण सोडले. देवेंद्र नाथ महतो यांच्यासोबत १० मिनिटांच्या व्हिडिओ कॉलमध्ये, सोनम वांगचुक यांनी आंदोलन …

Read More »

भारत आणि म्यानमार सीमा मोजणी न झालेल्या भागाची अदला बदली करणार

मणिपूरलगतच्या सामायिक सीमेवरील अनेक दशकांपासून सीमांकन न झालेल्या भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि म्यानमार संभाव्य भूभाग अदलाबदलीचा (territorial exchange) विचार करत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “सीमेवर असे काही भाग आहेत ज्यांचे सीमांकन अद्याप निश्चित झालेले नाही. त्या क्षेत्रांबाबत …

Read More »

केंद्र सरकारचा मेटाला इशारा, मार्क झुकरबर्गने माफी मागावी अन्यथा कायदेशीर संरक्षण गमवावे लागेल

बुधवारी मेटाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुक व्हिडिओ काही काळासाठी हटवल्याचा आणि बाल लैंगिक शोषणाचे साहित्य रोखण्यात आलेल्या त्रुटींवर आवाज उठवला. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटाच्या कंटेंट मॉडरेशन पद्धतींवर वाढत्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४५ मिनिटे चाललेली ही बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ आणि व्हिडीओचे रेकॉर्डिंग परवानगी शिवाय वापरता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्पष्ट केले की, न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वापराचे नियमन करणाऱ्या त्यांच्या आधीच्या अंतरिम आदेशामुळे मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांना सुनावणीचे वार्तांकन करण्यापासून रोखले जात नाही. आधीच्या आदेशात पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयीन कामकाजाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळवण्यावर आणि प्रसारित करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तसेच, या निर्देशांचा परिणाम मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांद्वारे …

Read More »

मुंबई वेधशाळेचा पाच दिवसांचा हवामान अंदाज; राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. ५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा व पुणे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे असे निर्देश …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे आठ निर्णय

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ, मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली,  राज्य माहिती आयोगात तीन अतिरिक्त आयुक्त, सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा खुलासा, ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द, शिवी वा असंसदीय शब्द नाही

काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडीया’ शब्द वापरला तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून …

Read More »

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणून टीका

ये ‘गुंगी गुडिया नही ये ‘आंधी’ है… हर्षवर्धन सपकाळ हाय हाय… हर्षवर्धन सपकाळ माफी मागा… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील गांधी भवन येथील कॉंग्रेस कार्यालयात घुसून हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध केला. जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर …

Read More »