Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

वर्षा गायकवाड यांची टीका, धर्मेंद प्रधानांचा राजीनामा अहंकाराचा पराभव

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा दयावा लागला पण त्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न संपत नाही. देशातील तरुणांनी लढा पुकारला की एक नवा इतिहास निर्माण होतो, आज तेच घडले असून कोट्यवधी तरुणांच्या दबावापुढे अहंकारी हुकूमशाहला झुकावे लागले आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अहंकाराचा पराभव आणि सत्य व संविधानाचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम ‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न होता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आषाढी शुद्ध एकादशी …

Read More »

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलविण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. …

Read More »

सचिन सावंत यांची माहिती, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय, तरुणाईचा विजय

देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा लढा संपलेला नाही, मोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधातील काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांना व या रॅकेट मधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे, …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, तर अशा प्रकारच्या गोष्टी दहापट मोठ्या घडू शकतात

राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा विजय असल्याचे म्हटले, परंतु सरकारला इशारा दिला की हे आंदोलन एका मोठ्या संकटाची केवळ सुरुवात आहे. जर सरकारने लोकांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर अशाच प्रकारच्या घडामोडी ‘दहापट मोठ्या’ प्रमाणात घडू शकतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, या सरकारला हटविण्याची वेळ आलीय

नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील तरूणांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत होते. अखेर आंदोलकांच्या दबावापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर विरोधी …

Read More »

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारच्या आश्वासनाने कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि आंदोलक व आयोजकांवरील एफआयआर मागे घेण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीच्या जंतर मंतरवरील आपले ४९ दिवसांचे आंदोलन अधिकृतपणे मागे घेतले आहे. सीजेपीचे प्रतिनिधी मंडळ आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा व जितेंद्र सिंह यांच्यासह सरकारच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, “सुबह हो गयी मामू”

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर काही क्षणांतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ मधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरत, “सुबह हो गई मामू.” अशी पहिली प्रतिक्रिया दिल्लीच्या जंतर मंतर येथील मंचावरून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे …

Read More »

अखेर केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाः कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तरुणांच्या मोठ्या आंदोलनाचा गैरफायदा घेण्यापासून “राष्ट्रविरोधी शक्तींना” रोखणे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. मोदी सरकारमधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने सततची रस्त्यावरील आंदोलने …

Read More »

बाबासाहेब पाटील यांची माहिती, शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पुढे बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टोक्ती, संकटातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनाची

आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत फडणविसांच्या पोलिसांची मजल गेली आहे. तरुण मुलांवर लाठीहल्ला केला जात आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?

मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांना केला. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. …

Read More »

अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला उशीर का?

अभिनेते प्रकाश राज यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचा उपवास सोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘राष्ट्राचा विवेक’ असे संबोधले. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला होणाऱ्या विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये, प्रकाश राज यांनी सोनम वांगचुक यांच्या उपवास सोडण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आणि स्वतंत्रपणे …

Read More »