Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, आरडीसींच्या अधिकारांचे ‘नवे’ वाटप जाहीर

राज्यातील महसूल प्रशासनाला अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीसह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारी व अधिकारात मोठे फेरबदल करण्याचा धडाकेबाज निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. प्रशासकीय कार्यपद्धतीत झालेल्या कालानुरूप बदलाचा विचार करून अधिकार व कामकाजाचे सुधारित व सुसंगत वाटप करण्यात आले आहे. तब्बल बारा वर्षांनंतर हा व्यापक निर्णय …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, मुंबईत सहा महिन्यात भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र सुरू करणार

राज्यातील भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू केल्या असून, केंद्र शासनाच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत सदस्य अर्जुन खोतकर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन येथे अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंमलबजावणीसाठी गठीत राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. या कायद्यासारख्या विशेष कायद्यामध्ये सरकारी वकिलांमार्फत दोषसिद्धी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्याचा उल्लेख त्यांच्या मूल्यमापनात करण्याचे …

Read More »

आदिती तटकरे यांची माहिती, पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना ई-रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, चालू आर्थिक वर्षात किमान ५ हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेची प्रभावी …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर

राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ईएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्या मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप, प्रसाद लाड, राजीव पोतदार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना …

Read More »

नरहरी झिरवाळ यांची माहिती, हाफकीनच्या खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून, महामंडळाच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील. तसेच हाफकिनचे खाजगीकरण करण्याचा शासनाचा कोणताही विचार नसल्याची स्पष्ट ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य ज्योती गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला …

Read More »

नरहरी झिरवाळ यांचा इशारा, शाळांच्या ५०० मीटर परिसरात अपायकारक पेयांची विक्री करणाऱ्यावर कारवाई

शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ; तसेच कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते. …

Read More »

पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आणखी एक महत्त्वपूर्ण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घेतला असून प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अर्थात पॉलीटेक्निक अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत …

Read More »

पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंदिरा नूयी म्हणाल्या, अमेरिके व्यतीरिक्त भारतासह इतर देशात सीईओ झाले नसते

पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नूयी यांनी एक वाद निर्माण केला. त्यांनी म्हटले आहे की, भारतासह अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात त्या जागतिक कंपनीच्या सीईओ ‘कधीही’ झाल्या नसत्या. आपल्या या प्रगतीचे श्रेय त्यांनी अमेरिकेच्या ‘गुणवत्तेवर आधारित’ (मेरिटोक्रॅटिक) प्रणालीला दिले आहे. बुधवारी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव कॉंडोलीझा राईस …

Read More »

राम मंदिरात झालेल्या दान चोरी प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून पहिल्यांदा भाष्य

अयोध्या येथील राम मंदिरात दानपेट्यांमधून झालेल्या चोरीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त करत पहिल्यांदा भाष्य केले. या घटनेला ‘अत्यंत वेदनादायक’ असे संबोधत, संघाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि मंदिर व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व असावे, अशी आशाही यावेळी व्यक्त केली. नवी दिल्लीतून जारी केलेल्या निवेदनात, संघाचे …

Read More »

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ

मुंबईतील अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा झालेल्या दुःखद मृत्यूची घटनेने गुरुवारी विधानसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या घटनेला गंभीर शासकीय निष्काळजीपणा बळी म्हटले असून, जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभा सभागृहात या विषयावरील चर्चेदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रशासनाच्या …

Read More »

दत्तात्रय भरणे याची माहिती, महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून सन्मान देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक राज्यातील महिलांसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, बायकोचे नाव ७ /१२ उताऱ्यावर घालण्याची तरतूद करा

आज विधानसभेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ऐतिहासिक ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ सादर केले. घरावर पत्नीचे नावही असले पाहिजे हा कायदा शरद पवार साहेबांनी आणला. त्याप्रमाणे बायकोचे नाव सातबारा उताऱ्यावर घालण्याची तरतूद करा, तर खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळेल असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, महापौर व पालिका आयुक्तांवरच ३०२ चा गुन्हा नोंदवा

मुंबईत मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भाजपा सरकार, बीएमसी प्रशासन व महापौरांनी नालेसफाईचे केलेले दावे फोल आहेत, हेच दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही तर ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. पहिल्या पावसात झाड कोसळून …

Read More »

मिनाक्षी नटराजन यांचा आरोप, वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट

देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क …

Read More »