Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

त्या सहा खासदारांच्या शिंदे शिवसेनेतील विलनीकरणास लोकसभाध्यक्षांची मान्यता

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना उबाठामधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेतील विलीनीकरणाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत औपचारिक मान्यता दिली. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अध्यक्षांच्या या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे …

Read More »

अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेकडून शाईफेक, दीपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर शनिवारी दिल्लीच्या जंतर मंतर येथे समर्थकांना संबोधित करत असताना एका हिंदूत्ववादी महिलने शाई फेकली. कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना २१ दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते …

Read More »

अभिनेता आमिर खानला बिश्नोई टोळीच्या अर्झु उर्फ टायसन बिश्नोईची धमकी

सोशल मीडिया पोस्ट आणि ऑनलाइन समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपनुसार, अभिनेता आमिर खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांकडून धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अर्झू बिश्नोई याने टायसन बिश्नोई नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हायरल पोस्टनुसार, आमिर खानला इशारा देण्यात आला आहे. अर्झू बिश्नोईचा आवाज असलेली एक ऑडिओ …

Read More »

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांचा आरोप, चाचण्याचे रिपोर्ट्स देत नाहीत

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून संफरदरजंग रूग्णालयात हलवित त्यांचे उपोषणाचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयात पोलिसांनी हलविल्यानंतर त्यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंग्मो यांनी सरकारी सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या पतीवर केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासण्यांबाबत शंका उपस्थित केली. तसेच सोनम वांगचुक यांच्यावर …

Read More »

पेपरफुटीची जबाबदारी टाळण्यासाठी आंदोलनस्थळावरून अखेर सोनम वांगचुक यांना उचलले

नीट परिक्षेसह अन्य परिक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाचे आंदोलन सुरु केले. तसेच २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवशी संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीने जाहिर केले …

Read More »

अर्थखात्यावरून महायुतीत घमासान; शिंदेंचा विरोध, राष्ट्रवादी आग्रही

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्यावरून महायुतीत पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष अर्थखाते मिळावे, यासाठी आग्रही असून या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अर्थखाते राष्ट्रवादीकडे देण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली …

Read More »

जपानच्या माजी मंत्री हिदेही माकिहारा यांचा आरोप, बुलेट ट्रेनला उशीर केवळ भारतामुळेच

एका माजी जपानी मंत्र्याने महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील कथित “विलंबा”साठी एका भारतीय मंत्र्याला आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी १५ जुलै रोजी त्यांच्यावर “पूर्णपणे बेजबाबदारपणा” केल्याचा आरोप केला. शिंकांसेन प्रकल्पावरील वाटाघाटींदरम्यान अधिकाऱ्यांनी वारंवार दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि “स्वार्थाचा” पाठपुरावा केला, असा आरोप त्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  बैठकीस जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील, जलसंपदा मंत्री (तापी कोकण पाटबंधारे महा विकास महामंडळ) गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे …

Read More »

वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा अडथळा आणल्यास तीन वर्षाची शिक्षा

भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा त्यात अडथळा आणल्यास, तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ही तरतूद सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असलेल्या विधेयकाच्या केंद्रस्थानी आहे. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक’ एकदा मंजूर झाल्यावर, वंदे मातरमला राष्ट्रगीत, तिरंगा आणि संविधानाप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळेल. हे विधेयक …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा

केंद्र सरकारच्या  धर्तीवर राज्य सरकारी  अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही  १ जानेवारी २०२६ पासून २ टक्के  महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे  केली. केंद्राने १ जानेवारी २०२६  पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २ टक्के  महागाई भत्ता वाढ केली आहे. या  निर्णयानुसार  महाराष्ट्र …

Read More »

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. १७ जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आय-हब क्वांटम …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

महाराष्ट्र सदनात आयोजित ‘ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा ठाम संदेश दिला. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्वतंत्र देव सिंह, विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पण नरेंद्र मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे मुद्दे व काँग्रेस पक्षाचे मुद्दे सारखेच असून काँग्रेस पक्षाने वांगचुक यांच्या आधीपासूनच नीट परीक्षेचा मुद्दा हाती घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दोघांचा लढा एकाच मुद्द्यासाठी, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली नाही, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांची अद्याप भेट का घेतली नाही? शिक्षण …

Read More »

सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन २० जुलैपर्यंत सुरु राहणार

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी सांगितले की, ते २० जुलैपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवतील जेणेकरून ते ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) प्रस्तावित संसद मोर्चाचे नेतृत्व करू शकतील. सोनम वांगचुक यांनी असेही नमूद केले की, जर ही मोहीम यशस्वी झाली नाही, तर ते “भूत बनून परत येतील”. शुक्रवारी …

Read More »