Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय

मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असे सांगत सामाजिक सलोखा, कायदेशीर मार्ग …

Read More »

रामदास आठवले यांना १२ वर्षानंतर खंत, शिर्डीतील पराभवामुळे शरद पवार यांची साथ कायमची सुटली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले, तरी त्यांच्यातील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र शिर्डी मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची साथ सुटली, अशी खंत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार

झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देऊन …

Read More »

आ. रईस शेख यांची मागणी कूपर आणि सायन रुग्णालयांत यंत्रांच्या खरेदी विलंबप्रकरणी विपिन शर्मा यांची चौकशी करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रे खरेदी प्रकरणी दोन वर्षांच्या विलंबाकडे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी लक्ष वेधले. रोग निदानासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असून अनेकांना खाजगी रुग्णालयांत महागड्या उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. आमदार रईस …

Read More »

भारताला युरेनियमच्या सुरळीत पुरवठा होण्याच्या अनुषंगाने उझबेकिस्तानसोबत चर्चा

भारत आणि उझबेकिस्तानने रविवारी आपले संबंध सर्वसमावेशक सामरिक भागीदारीपर्यंत उन्नत केले आणि दीर्घकालीन युरेनियम पुरवठा व्यवस्थेसाठी काम करण्यास सहमती दर्शवली. यासोबतच दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारातील प्रगतीची …

Read More »

आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांच्यावर अपक्ष खासदार कपिल सिबल यांची टीका

राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी रविवारी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली. भागवत यांनी अमेरिकेत ‘विविधतेतील एकता भारताच्या डीएनएमध्ये आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यावर कपिल सिबल म्हणाले की, शब्दांना महत्त्व नाही, कृती बोलली पाहिजे. अपक्ष खासदार आणि ज्येष्ठ वकील असलेल्या कपिल सिबल यांनी सांगितले की, भागवत यांची टिप्पणी …

Read More »

केरळमधून नेपाळला गेलेल्या ३१ जणांचे प्राण वाचले ते बुद्ध विहारात २० मिनिटे घालविल्याने

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात अडकल्यानंतर, केरळमधील महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसह ३१ सदस्यांचा एक गट रविवारी कोचीला सुखरूप परतला. अनेकांच्या मते, बुद्ध मंदिरात २० मिनिटांच्या विलंबामुळे त्यांचे प्राण वाचले. विमानतळावर प्रवाशांची त्यांच्या चिंतातुर कुटुंबियांशी भेट झाली, तेव्हा भावुक दृश्ये पाहायला मिळाली. या गटाने सांगितले की, ते काठमांडूहून पोखराकडे प्रवास …

Read More »

नेपाळ पुरातील मृतांची संख्या ७६८ वर पोहोचली , भोटेकोशी नदीच्या पाणी पातळीत वाढ

देशाच्या मध्य भागातून आलेल्या विनाशकारी अचानक आलेल्या पुराच्या काही दिवसांनंतर, भोटेकोशी नदीतील पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याने रविवारी नेपाळमध्ये सतर्कता कायम राहिली. अधूनमधून पडणाऱ्या पावसात आणि पुन्हा पूर येण्याच्या भीतीने शोधकार्य सुरू असताना, अधिकाऱ्यांनी बाधित जिल्ह्यांतील रहिवाशांना आणि बचाव पथकांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या …

Read More »

नेपाळ सरकारचा निर्णय, ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही त्या मृतदेहांवर सामुदायिक अंत्यसंस्कार

मृतदेहगृहे आणि तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये जागा संपल्याने आणि मृतदेह कुजायला लागल्याने नेपाळने ओळख न पटलेल्या पूरग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे. दफन करण्यापूर्वी अधिकारी डीएनए नमुने, छायाचित्रे आणि इतर ओळख पटवणारे पुरावे गोळा करत आहेत, जेणेकरून कुटुंबीय नंतरही आपल्या प्रियजनांची ओळख पटवू शकतील, असे ‘द काठमांडू पोस्ट’ने वृत्त दिले आहे. …

Read More »

एका शिक्षकाच्या तात्काळ विचाराने शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांचे वाचले प्राण

नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यातील ‘त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना बुधवारी सकाळी ९:२० वाजता एका मित्राकडून हा इशारा मिळाला. त्याने सांगितले की गाव नष्ट झाले आहे; नदीने ते गिळंकृत केले आहे. त्याने मला पळून जाण्यास सांगितले. हिमनदीचे ग्लेसियर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी महापुराने डोंगराळ भागातील नद्यांच्या प्रवाहातून रौद्र रूप …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात

नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा येथून ४१ जण आज परतले असून १०६ जण नागपूरला उद्या पहाटे …

Read More »

राहुल गांधी यांची मागणी, हल्दवानी प्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा

हल्दवानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रॅलीच्या ठिकाणी कथित ‘शुद्धीकरण’ विधीवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या वळणावर पोहोचला आहे. काँग्रेसने दलितांविरुद्धच्या भेदभावावरून भाजपावर आरोप सुरु केले आहेत. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांविरुद्ध ‘अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ (SC/ST Act) अंतर्गत गुन्हा (FIR) …

Read More »

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले. बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जालन्यात बैल विक्रीच्या आरोपातून दलित तरूणाला शेण खायला लावल्याचा संतापजनक प्रकार

जालन्यात दलित तरुणावर बैल विक्रीचा आरोप करत मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि त्याला शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे, त्याच्या ११ वर्षांच्या मुलालाही अशीच अमानुष वागणूक देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, …

Read More »

उच्च न्यायालयाने एफडीएला प्रश्न उपस्थित करताच, सिप्ला विरोधातील आदेश घेतला मागे

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरिंग अँड फॉरवर्डिंग (सी अँड एफ) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आपला आदेश मागे घेतला. मुंबई उच्च न्यायालयाने नियामक संस्थेवर “अतिरेक” आणि “मनमानी” पद्धतीने वागल्याचा आरोप केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …

Read More »