विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचा सत्तेचा उन्माद दिसून आला. जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस, प्रमाणे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला. लोकशाही नाही तर ठोकशाही पद्धतीचे चित्र या निवडणुकीत दिसले. बळी तो कान पिळी प्रमाणे भाजपाची भूमिका असून आता …
Read More »उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबत बैठक, बैठकीला तीन आमदार गैरहजर सभागृहाच्या कामकाजादरम्यान सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश
मागील काही वर्षांपासून सातत्याने राजकीय आव्हानांना तोंड देत असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात दुसऱ्यांदा झालेल्या फुटीनंतर राजकीय हालचालींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना उबाठापासून पक्षाच्या सहा खासदारांनी फारकत घेतल्यानंतर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, अर्थात सोमवारी, आपल्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. ही बैठक ‘शिवालय’ …
Read More »पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथील २० हेक्टर जमीन हस्तांतरणास महसूल मंत्र्यांची मान्यता
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने गृह …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा शासन लवकरच घेणार दिलासादायक निर्णय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार
राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांवर …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार
४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, …
Read More »सलग सातव्या दिवशीही आरटीओच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेकडून संप सुरुच, प्रलंबित मागण्यांबाबत शासन प्रशासनाची टोलवाटोलवी
आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली तरी सेवा प्रवेश नियम तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास शासन प्रशासन टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळे मंगळवारी १६ जूनपासून आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या …
Read More »पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने सरकारचे ऋण काढून सण…? ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या, शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी, केंद्राकडून भांडवली बिनव्याजी कर्ज १० हजार कोटी
राज्यातील भाजपा प्रणित राज्य सरकारकडून सध्या विकास कामांचा धडाका आणि विविध योजनांसाठी मुबलक पैशांची तरतूद करण्याचे धारिष्ट दाखविले जात आहे. मात्र साधारणतः सात लाख कोटीच्या अर्थसंकल्पासाठी साधारणत ५ ते ५.३० लाख कोटी रूपयांची रक्कम जमा होणे आणि ती खर्च राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या महसूलासाठीचे मार्ग …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट, सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ
शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रपरिषदेत विरोधी …
Read More »राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही
राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी मतदान घेण्यात आले. राज्यातील १० जिल्ह्यांतील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातील …
Read More »
Marathi e-Batmya