Breaking News

अजित पवार यांची म्हणाले, शेती ही संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, ‘चक्र’च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य …

Read More »

संजय शिरसाट यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी २५ कोटींची तरतूद स्मारकाच्या जागेची पाहणी, १५ दिवसात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने २५ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक, कुंभमेळ्याचे मुहुर्त

कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा आरोप, लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील मोदी सरकारने घालविलेली पत भारतीय सैन्याने सावरली

भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडल्याचे काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी सांगितले. अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली …

Read More »

राज्य सरकारचा पुन्हा इशारा, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये १० जूनपर्यंत पावसात होणार घट

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ५ जून पर्यंत मान्सूनच्या पावसात घट होणार असल्याचा अंदाज राज्य सरकारकडून व्यक्त करत पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन केले होते. त्यास आता काही दिवसांचा अवधी जात लोटत नाही तोच आज राज्य सरकारने पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक जारी करत १० जून पर्यंत पावसात घट होणार …

Read More »

अमोल मातेले यांची सरनाईक यांच्यावर टीका, ते विधान दुर्दैवी आणि अपमानजनक हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाल्याचे विधानावरून केली टीका

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे” असे विधान करून केवळ मराठी भाषेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अपमान केला आहे. हे विधान निषेधार्ह, दिशाभूल करणारे आणि संपूर्ण मराठी समाजाच्या भावना दुखावणारे आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष …

Read More »

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना फटकारत म्हणाले, मग काही गोष्टी बोलून का दाखवता? मला हे वादग्रस्त वक्तव्य फार महाग पडतय

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी वादग्रस्त व्यक्तव्ये करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याची दखल घेतली. तसेच माणिकराव कोकाटे यांना फटकारत काही सूचनाही केल्या. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त व्यक्त केले होते. त्यानंतर नुकतेच अवकाळी पावसामुळे आणि मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाताला …

Read More »

अमेरिकन इमिग्रेशनमध्ये फ्रॉडः इमिग्रेशनसाठी लग्नाची फसवणूक भारताकडून या गोष्टीला मान्यता

अमेरिकेत एका भारतीयाशी संबंधित एका प्रकरणात लग्नाची फसवणूक झाली आहे. जेव्हा परदेशी नागरिक आणि अमेरिकन नागरिक एकत्र जीवन सुरू करण्यासाठी नव्हे तर परदेशी व्यक्तीला अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी देण्यासाठी लग्न करतात तेव्हा विवाह फसवणूक होते. विवाह फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकाचा उद्देश कायदेशीर कायमचा रहिवासी बनणे आणि शेवटी अमेरिकन नागरिक …

Read More »

भारत चौथ्या दर्जाची अर्थव्यवस्था, पण जीडीपी वाढीचा फायदा कोणाला २०१४ ते २०२४ दहा वर्षात १.९ ट्रिलियनची वाढ

२०१४ मध्ये १० व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याने ११ वर्षांत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणे हे काही साधेसुधे यश नाही. या काळात भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) जवळजवळ दुप्पट झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये भारताचा जीडीपी GDP २.० ट्रिलियन डॉलर्स इतका अंदाजे होता जो २०२४ मध्ये अंदाजे ३.९ …

Read More »