कराड : प्रतिनिधी कोरोना लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लोकांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती संपली आहे व बाजारपेठेत मागणी (demand) नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरवठादारांच्या किंवा उद्योगांच्या मालाची विक्री (supply) होणे अवघड होणार आहे. जागतिक अर्थतज्ञांनी भारतामध्ये गंभीर आर्थिक मंदीचे भाकीत वर्तविले असून मागणी वाढावी यासाठी सरकारने चौकटी बाहेर …
Read More »आता ३१ ऑगस्टपर्यत कर्जथकबाकी वसूलीसाठी तगादा नाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक संस्था आणि केंद्रे बंद आहेत. त्यामुळे कर्ज थकबाकीदारांकडे पुढील आणखी तीन महिने तगादा लावू नये असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांता दास यांनी दिले. तसेच बँकेच्या रेपो रेट मध्ये ०.४ टक्क्याने कपात करण्यात आली सून रिझर्व्ह रेपो रेट मध्ये ३.३५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने …
Read More »मराठी तरूणांसाठी कोरोनाकाळातील उद्योग क्षेत्रात नव्या संधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्या पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जावू, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया …
Read More »पॅकेज-५: राज्यांना यापूर्वीच काहीस दिलयं: ओव्हर ड्राफ्ट देण्याची रिझर्व्ह बँकेला विनंती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशावर कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक प्रश्नांनी आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केलीय. तत्पूर्वीच राज्यांना जीएसटी वसूली पोटी द्यावयाची रक्कम एप्रिल महिन्यातच दिली आहे. तर आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून ४ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याचे सांगत आलेल्या …
Read More »पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …
Read More »पॅकेज-२: राज्याच्या धर्तीवर स्थलांतरीत कामगार, शहरी गरीबांसाठी भाडेतत्वावरील घरे वन नेशन वन रेशन कार्ड योजना अंमलात आणणार असल्याची अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कामगार, सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अडचणींची संक्रात आली. त्यामुळे येथून पुढे स्थलांतरीत आणि शहरी भागातील नागरिकांनासाठी भाडेतत्वावरील घरे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्याशिवाय सर्वांसाठी घरे या योजनेतून बँकाकडून मिळणाऱ्या व्याज सूट मोहीमेला एक …
Read More »पॅकेज-१: आयकरसाठी ३० नोव्हें. पर्यंतची मुदत : टीडीएस टीसीएसमध्ये २५ टक्के कपात लघु व मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे कर्ज देणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे भेडसाव्या लागत असलेल्या आर्थिक नुकसानीत नागरिकांना आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार, व्यापारी आणि उद्योजकांना उत्पन्नावरील आयकर भरण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि ऑडिट करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देत टीडीएस आणि टीसीएसच्या दरात थेट २५ टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच ही …
Read More »उत्पादकतेला आरोग्याची जोड द्यावी लागणार कोरोनासोबत जगण्यासाठी पोटाला भाकर आणि हाताला काम द्यावे लागेल
चीनमध्ये डिसेंबर १९ ला मध्ये आढळून आलेल्या covid-19 विषाणूचा फैलाव भारतात होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च २४ ला लॉकडाउन सुरू झाला. १३० कोटीचा देश स्तब्ध झाला. यामुळे मोठ्या जनसंख्येचे उत्पन्न बुडाले, बचत संपायला लागली, रोजगार बुडाला. साहजिकच साथ येण्यापूर्वी डबघाईस आलेली अर्थव्यवस्था पूर्ण बुडण्याच्या मार्गावर आहे. धोरणकर्ते लॉकडाउनमध्ये काय करावे …
Read More »खुशखबर : लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज : विदेशी गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरु राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच औद्योगिक आणि वित्तीय कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्याच चालना देण्यासाठी राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग …
Read More »अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या तज्ञगटाच्या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ञाच्या या अहवालात सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज विचारविमर्श करण्यात आला. उपसमिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी …
Read More »
Marathi e-Batmya