लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला
लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …
Read More »उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती तक्रार
लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी उष्णतेची लाट असतानाही मतदान केंद्रांवर अंत्यत धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ४८ टक्क्याच्या जवळपास मतदानाची आकडेवारी पुढे आली. त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल …
Read More »एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी
लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, जाहिर झालेले एक्झिट पोल खोटारडे, सरकारी अमित शाह यांच्यावरील आरोपावरून जयराम रमेश यांचे आयोगाला प्रत्त्युतर
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले होते” या दाव्यावर निवडणूक आयोगाने रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून अधिक माहिती मागवली. जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक मंडळाने त्यांना आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तपशील सामायिक …
Read More »अरूणाचल प्रदेश विधानसभेत तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत ४६ जागा भाजपाने जिंकल्या
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ६० सदस्यांच्या विधानसभेत ४६ जागा जिंकून भाजपाने २ जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले. १९ एप्रिल रोजी ईशान्येकडील राज्यात ज्या ५० जागांसाठी निवडणुका झाल्या त्या ५० जागांवर मतमोजणी झाली. उर्वरित १० जागा भाजपाने यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या होत्या. विधानसभेच्या ५० जागांपैकी भाजपाने ३६ जागा जिंकल्या. मुख्यमंत्री …
Read More »अरविंद केजरीवाल जाता जाता म्हणाले, सर्व एक्झिट पोल बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज तिहार तुरुंगात आत्मसर्मपण
दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केला होता. तसेच २ जूनला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करण्याची अट जामीन देताना घातल होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरूंगात जाण्यासाठी घरातून दुपारी निघाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, …
Read More »प्रविण दरेकर यांचा दावा, जयंत पाटील भाजपा किंवा काँग्रेसच्या वाटेवर लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रविण दरेकर यांचा दावा
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असा मोठा दावा भाजपा विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला. पत्रकारांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, जयंत पाटील यापूर्वीच भाजपात किंवा काँग्रेसमध्ये जातील असे चित्र होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे भविष्य त्यांना माहित आहे, म्हणून …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सवाल, मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ? नरेंद्र मोदी यांनी स्वतःची तुलना थेट देवाशीच करण्यावरून साधला निशाणा
लोकसभा निवडणूकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार काल ३० मे रोजी थंडावला. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीचा प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद मेमोरियल येथे ध्यान धारणेसाठी जाणार असल्याचे जाहिर केले होते. तत्पूर्वी लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा जन्म बायोलॉजिकल प्रोसेस …
Read More »सुप्रिया सुळे यांची टीका, हे सरकार घर फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीत व्यस्त कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश
हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रियाताई सुळे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya