मुंबई : प्रतिनिधी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिक रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात उभे राहीले आहेत. बहिष्काराच्या भीतीपोटी राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी जमिन संपादनाची ती अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय जाहीर सभेत केला. मात्र त्यात्र त्यास काही तासांचा अवधी उलटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती अधिसूचना …
Read More »नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. शिवसेनेने आज नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी सडकून टिका केली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत आज नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची …
Read More »पैशाची मस्ती इथे चालणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
नाणार : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत सगळेच जण शिवसेनेची भूमिका काय विचारतात. त्या सर्वांना सांगतो की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून हा प्रकल्प तरीही इथे आला तर त्याची राख करू असा सज्जड दम राज्य आणि केंद्र सरकारला दिला. पैशाच्या बळावर येतील शेतकऱ्यांची जमिन खरेदी करून सौदी अरेबियाच्या …
Read More »समस्त सोलापूरकरांच्या सहभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता मिरवणूकीत ७ ते ८ लाख आंबेडकरी अनुयांची उपस्थिती
सोलापूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गेले आठवडाभर सुरु असलेल्या जंयती उत्सवाची सांगता काल रविवारी झाली. जंयतीनिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मध्यवर्ती समितीच्या मिरवणूकीत तब्बल १०० हून अधिक मंडळांनी सहभाग घेतला. सकाळी मोठ्या जल्लोषात सुरु झालेली मिरवणूक रात्री १२ वाजता संपली. या मिरवणूकीत तब्बल ७ …
Read More »बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा विजेत्यास २५ हजाराचे बक्षीस मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शासनाने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा …
Read More »माधुरीने गायले सुमेधच्या अभिनयाचे गोडवे बकेट लिस्टमध्ये माधुरीसोबत दिसणार
मुंबई : प्रतिनिधी अश्विनी भावेंची मुख्य भूमिका असलेल्या ‘मांजा’ या सिनेमात आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर खलनायकी रंग भरणारा एक गोंडस चेहरा दिसला होता. सिनेमाइतकंच या खलनायकी भूमिकेतील या चेहऱ्याचंही सर्वांनी कौतुक केलं. सुमेध मुद्गलकर नावाचा हा अभिनेता आता लवकरच आणखी एका मराठी सिनेमात झळकणार आहे. ‘मांजा’पूर्वी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या राजेश …
Read More »राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी शरद पवार यांची फेरनिवड होणार अर्ज दाखल ३० एप्रिल रोजी अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडणार
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचा अर्ज आज पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस मास्टर पितांबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत फक्त शरद पवार यांचाच अर्ज पक्षाकडे आला आहे. त्यामुळे ३० …
Read More »नालेसफाईची माहिती प्रसिध्द करण्याबरोबरच गाळ टाकण्याचे चित्रिकरण करा स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करण्याचा भाजप मुंबई अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांचा महापालिकेला इशारा
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्वे प्रशासनासोबत दोन वेळा बैठक घेत्यानंतर तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्या पाहणीचा आढावा घेतल्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्या स्थायी समितीने नालेसफाईच्या कामांबाबत सावधानता बाळगावी, दर आठवड्याला नाले सफाईची माहीती प्रसिध्द करण्याबरोबरच डंपींग ग्राऊंडवर गाळ टाकण्याचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करण्याची सूचना भाजप …
Read More »बीकेसीच्या धर्तीवरील कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीत भूमिपुत्रांना भागीदारी पायाभूत विकासासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येणार असून स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सरकारी दबावामुळेच असीमानंद, कोडनानी यांची सुटका कट्टरतावादी धर्मांध संघटना आणि लोकांबाबत सरकारचे जाणिवपूर्वक बोटचेपे धोरण : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात सीबीआयने अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याकरिता दाखवलेली असमर्थतता अतिशय संतापजनक असून तपास यंत्रणा सरकारच्या प्रचंड दबावाखाली काम करित आहेत. कट्टरतावादी धर्मांध संघटनांच्या बाबतीत भाजप सरकारने जाणिवपूर्वक घेतलेले बोटचेपे धोरण याला कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. …
Read More »
Marathi e-Batmya