Editor

महाराष्ट्रातील ३ लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविणार सामंजस्य कराराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

महाराष्ट्रातील महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि आयपीई ग्लोबल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. आयपीई ग्लोबल लिमिटेड या संस्थेने महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भागीदारीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून संबंधित विभागांकडून यासाठी आवश्यक …

Read More »

८० व्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव देशातील १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या एकूण १ हजार ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून, विविध क्षेत्रांत बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात …

Read More »

८० व्या स्वांतत्र दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, सिंधू पाणी करार निलंबित करणे राष्ट्र हिताचे शेतकऱ्यांसाठी निर्णयक पाऊल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना, “दहशतवादाला आश्रय देणाऱ्या” देशासोबतचा सिंधू पाणी करार निलंबित करणे हे राष्ट्रीय हिताचे, विशेषतः शेतकऱ्यांसाठी, एक निर्णायक पाऊल असल्याचे वर्णन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा इशाराही दिला की, दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना “ते कुठेही लपले असले तरी” …

Read More »

अमित शाह यांचे नाव घेतल्या प्रकरणी राहुल गांधी यांना भाजपाची हक्कभंगाची नोटीस २८ तारखेपर्यंत नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश

भाजप खासदारांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीसंदर्भात लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि …

Read More »

मोदींवरील टीकेवेळी मेलोनी यांचा संदर्भ, सरकारची राहुल गांधी यांना सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी इटलीशी संबध विस्तारले असल्याची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी राजनैतिक संवादात परस्पर आदराची अपेक्षा व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात भारताचे इटलीसोबतचे संबंध “सर्वच बाबतीत” विस्तारले आणि बळकट …

Read More »

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा एकविसावा वर्धापन दिन

एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला सीडब्ल्यूसीची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्लूआरआरए) च्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचे स्वागत केले.भारताची प्रगती, महाराष्ट्राची आर्थिक ताकद …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपा, पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर टीका मेलोनी प्रकरणावरून मोदी यांच्यावर केली टीका

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी मंचावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह परदेशी नेत्यांना दिलेल्या मिठीवर टीका केली. रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “त्यांना (पंतप्रधान मोदींना) ही कल्पना कुठून सुचली हे मला माहीत नाही. लोकांच्या डोक्यात …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्या ठिकाणी भाषण केले त्या ठिकाणाचे भाजपा समर्थकांकडून शुद्धीकरण उत्तराखंडमधील श्री राम सेना संघटनेचे काम, अशा घटनांना भाजपचा पाठिंबा नाही

भाजपशासित उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या ठिकाणी सभेला संबोधित केले होते, त्या ठिकाणी ‘शुद्धीकरण’ विधी पार पडल्याचे सांगितल्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. मल्लिकार्जून खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी या घटनेला “दुर्दैवी” म्हटले आणि भाजप अशा उपक्रमांना पाठिंबा देत नाही, असे सांगितले. …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत नरेंद्र मोदी-अमित शाह हजर, वंदे मातरमने सुरुवात कामकाजाला सुरुवात पण कामकाज संपवले

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन …

Read More »