Breaking News

कर्नाटक उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश, केएससीए कायदेशीर कारवाई नको जबरदस्तीची कारवाई करण्यापासून न्यायालयाने रोखले

४ जून रोजी बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे कर्नाटक उच्च न्यायालयाने पोलिसांना कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनविरुद्ध कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे निर्देश दिले. ६ जून रोजी, न्यायमूर्ती एस.आर. कृष्णा कुमार यांनी केएससीएच्या अध्यक्ष रघुराम भट, सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष ई.एस. …

Read More »

राज्यसभेसाठी अभिनेता कमल हासन यांनी भरला उमेदवारी अर्ज डिएमके पक्षाने मक्कल निधी मैयम पक्षाला दिलेल्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज भरला

मक्कल निधि मैयम (MNM) चे अध्यक्ष आणि अभिनेता कमल हासन यांनी शुक्रवारी (६ जून, २०२५) चेन्नई येथील तामिळनाडू सचिवालयात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे ही हजर होते. द्रमुकचे मित्रपक्ष – व्हीसीके नेते थिरुमावलावन, एमडीएमके नेते वायको आणि तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आवाहन, ‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करा सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून करून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. एस.टी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री योगींनी माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट …

Read More »

रईस शेख यांची मागणी, ‘एसटी’ला ‘समृद्धी’वर परवानगी देत नाही तोपर्यंत राज्यात समृद्धी येणार नाही सामान्यांच्या पैशावर उभारलेल्या महामार्गाच्या वापरापासून सामान्य दूर

‘मुंबई ते नागपूर’ या ७०१ किमीच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’वर ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसेसना धावण्यास संमती द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख …

Read More »

आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा विश्वास, आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केल्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन

राज्यात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील १ कोटी ३५ लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत, असे राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलून या आयोगासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद ही केल्याबद्दल अशोक उईके यांनी …

Read More »

मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्ये करणाऱ्या पानोलीला उच्च न्यायालयाकडून जामीन कोलकाता उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सोशल मीडियावर मुस्लिम समुदायाविरुद्ध भावना भडकाविणाऱ्या पोस्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २२ वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी शमिष्ठा पानोलीला कोलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम जामीन मंजूर केला. [शमिष्ठा पानोली @Sharmishta Panoli Raj विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य आणि इतर]. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांनी हा …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा सवाल, मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ? १५ पाणबुड्यांचे आयुष्य ७ ते ८ वर्षापर्यतचेच

धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? याचा …

Read More »

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोजणीदारांचे काम बंद आंदोलन मागे

राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत …

Read More »

चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्च न्यायालयाकडून सु-मोटो दखल पुढील सुनावणी १० जून रोजी घेणार

रॉयल चॅलेंजर्सच्या विजयानिमित्त बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमानंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर काल झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची कर्नाटकच्या उच्च न्यायालये सु-मोटो दखल घेत याप्रकरणी खटला दाखल करून घेतला. तसेच या प्रकरणी आज सुनावणी घेतल्यानंतर याप्रकरणाची पुढील सुनावणी १० जून घेण्याचा निर्णय घेतला. कर्नाटक उच्च न्यायालयाचे …

Read More »