मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण …
Read More »राज्याला पोलिओमुक्त करण्यासाठी ८५ हजार बुथची उभारणी २८ जानेवारीला विशेष मोहिम राबविणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातून पोलिओ आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ८५ हजार बुथची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी २८ जानेवारी व ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली. या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. …
Read More »कर्करोगावर सातत्याने नवे संशोधन होत राहणे गरजेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सूचना
मुंबई : प्रतिनिधी वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेल्या संशोधकांनी कर्करोग क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत राहणे आवश्यक आहे. मात्र या अनुषंगाने प्राचीन आयुर्वेदामधून काही पर्यायी उपाय मिळू शकतात का यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त करत कर्करोगावर स्वदेशी आणि परवडणारे उपायांच्या अनुषंगाने संशोधन करावे अशी सूचनाही त्यांनी …
Read More »मायमेडिसीन बॉक्सची राष्ट्रव्यापी व्हिटामिन-डी विरोधी जागरुकता मोहिम २९ राज्यांतील २ हजार ठिकाणी, १ दशलक्ष लोकांना सेवा प्रदान करणार
मुंबई: प्रतिनिधी मायमेडिसीनबॉक्स कंपनीच्यावतीने देशातील व्हिटामिन–डीच्या कमतरतेबाबत जनजागृती अभियान राबविणार असून देशात एकाचवेळी २ हजार ठिकाणी सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी घरी औषधांचे वितरण आणि प्रयोगशाळा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. देशात ६५–७०% लोकसंख्येत व्हिटामिन–डीची कमतरता असल्याने त्याबाबत जनजागृकता अभियान राबविण्यात येणार आहे. आजच्या जगात जेथे जीवन अतिशय वेगवान …
Read More »भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविणार मुख्यमंत्र्याशी चर्चा करून धोरण तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांच्या चाव्याने झालेल्या रेबीजच्या रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज …
Read More »शासकीय महाविद्यालये, रुग्णालयांना दर करारानुसार औषध खरेदीस मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी औषधांचा साठा संपलेल्या किंवा संपुष्टात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रूग्णालयांना शासनाने विहित केलेल्या अस्तित्त्वातील दर करारानुसार खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर संपुष्टात आलेल्या औषधी विषयक बाबींच्या खरेदीसाठीच्या दर करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी …
Read More »घाण, कचरा टाकणार आणि थुंकणार असाल तर दंड भरण्याची तयारी ठेवा शहरांमध्ये १५० ते ५०० आणि तालुक्यात १०० ते ५०० रूपयांपर्यत भरावा लागणार
मुंबईः प्रतिनिधी रस्त्यांने चालताना कचरा टाकणार असाल किंवा थुंकणार असाल किंवा लघवी लागली असेल तर योग्य ठिकाणीच या सर्व गोष्टी करा. नाहीतर या गोष्टी करून बसाल आणि त्याची भरपाई तुम्हाला १०० ते ५०० रूपये भरून करावी लागेल. राज्यात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने रस्त्यांवर थुंकणे, कचरा आदी टाकूण घाण करणे, उघड्यावर लघवी, …
Read More »कॅन्सर व हृदयरोग रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे केंद्राची आऊटलेट फार्मसी नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड मार्फत देशातील कॅन्सर व हृद्यरोग आजाराने ग्रस्त असलेल्या नागरीकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी स्थानिक पातळीवर आऊटलेट फार्मसी सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे या फार्मसी सुरु करण्यात येणार असून या फार्मसीमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात औषधे मिळणार …
Read More »महात्मा फुले जीवनदायीतून कर्करोगावरील उपचारासाठी मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
जळगांव : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र राज्यात कर्करोगाचे वाढते रूग्ण लक्षात घेता महात्मा फुले जीवनदायी आरोग्यसेवेच्या माध्यमातून इतर मोठ्या आजारांबरोबरच कर्करोगाच्या रूग्णांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे भूमीपूजन, राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या शुभारंभ मुख्यमंत्री.फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर …
Read More »बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणार आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आश्वासन
नागपुर : प्रतिनिधी नाशिक व गोरखपुर या दोन्ही धटना परस्पर विरोधी आहेत. गोरखपुरची घटना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली. तर नाशिक मधील घटना काही त्या शहरातली नाही. ठाणे, पालघर, धुळे या आदीवासी पट्ट्य़ातील कुपोषित बालके उपचारार्थ नाशिकमध्ये येतात. यामध्ये जन्मता मृत्यू किंवा जन्मा अगोदर मृत्यू दरामध्येही फरक आहे. वातावरणातील फरक याला कारणीभूत …
Read More »
Marathi e-Batmya