काही वर्षापूर्वी दिल्लीतील राज्य सरकार आणि काँग्रेसचे सरकार कांद्याच्या वाढत्या किंमतीवरून सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. तर कोरोना काळापासून देशासह राज्यातील जनतेला सातत्याने महागाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर तसेच कांद्याच्या प्रश्नावर देशातील जनता आणि शेतकरी यांचा रोष किती मोठा असतो याचे ढळढळीत उदाहरणच शिंदे गटाच्या आमदाराने मोदी सरकार …
Read More »ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले.
१५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या BRICS परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. २०१९ नंतर प्रथमच ब्रिक्स देशांचे नेते ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका एका …
Read More »शरद पवार यांचा आरोप, विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवले जाते…फोन केला जातो काही सहकारी तुरुंगात गेले पण पक्ष बदलला नाही
सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्या कार्यालयात गेले तर त्यांच्या कार्यालयात विविध भाषेतील वृत्त वाहिन्या लावलेल्या असतात. जी भाषा कळत नाही त्या वृत्तवाहिनीवरील बातम्यांवरही लक्ष ठेवले जाते आणि ती बातमी जर सरकार विरोधी असेल तर संबधितांना फोन करून परत होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »Ladakh : पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील सैनिकांच्या मृत्यूबद्दल केला शोक व्यक्त ट्विटरवरून केला शोक व्यक्त
पंतप्रधान कार्यालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे: “लेहजवळ झालेल्या दुर्घटनेमुळे आम्ही भारतीय लष्कराचे जवान गमावले आहेत. त्यांची देशासाठी केलेली भरीव सेवा नेहमीच स्मरणात ठेवली जाईल. शोकग्रस्तांना शोक. कुटुंबे. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी.” Pained by the mishap near Leh in …
Read More »शरद पवार यांचा इशारा, …आता माघार नाही ज्यांच्याकडून शिकला त्यांच्याबद्दल योग्य भावना ठेवा नाहीतर जनता योग्य जागा दाखवेल अजित पवार गटाला यांना टोला
आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत या गोष्टी अधिक होत आहेत. सत्तेचा गैरवापर करत लोकांना तुरुंगात डांबून कोणी वेगळं राजकारण करत असेल त्यांना उलथून …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, विवेक देबरॉय व रंजन गोगोईंच्या विधानांशी नरेंद्र मोदी सहमत आहेत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज विचारांचे म्हणून अपमान करणाऱ्यांचा राजीमाना घ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी… शरद पवारांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर
ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजपा देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात असा पलटवार …
Read More »शरद पवार यांचा मोदींना टोला, कदाचित देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसतय १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांचा टोला
राज्यात आणि देशात काही इंग्रजी शाळा आहेत. त्या शाळांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच केंद्रात बसलेल्या ज्या विचाराचे सरकार आहे त्यांच्याकडून असे काही निर्णय घेतात की समाजात आणि धार्मिकस्तरावर अशांतता निर्माण होते. तशा निर्णयामुळे मणिपूरही दोन महिन्यापासून जळत आहे. मात्र मणिपूरला जाण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. उलट लाल …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हरणार की जिंकणार मतदार…. मोदीजी देश कसा एकसंध ठेवणार
देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन असून प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची महती सांगत पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हे देखील असा आरोप करत पुढच्या वर्षी …
Read More »लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०२४ ला मीच पुन्हा भाषण करणार आधी महिलांविषयी विचारधारा बदलण्यासाठी मदत तर आता पुन्हा भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी आशिर्वाद मागितला
गतवर्षी महिलांबद्दल असलेल्या विशिष्ट दृष्टीकोन असलेल्या समुदायाने आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आपली साथ हवी अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी लाल किल्ल्यावरून घातली होती. त्यात आज पुन्हा नव्याने काही गोष्टी समाविष्ट करत पुन्हा एकदा यावेळीही आपला काँग्रेस विरोधाचा आलाप आळवत देशातील परिवार वाद आणि भ्रष्टाचाराच्या …
Read More »
Marathi e-Batmya