Tag Archives: काँग्रेस

कर्नाटकाच्या विधिमंडळात आरएसएसचे गीत, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची माफी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आरएसएसचे गीत

गेल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे गीत नमस्ते सदा वत्सले मातृभूमे गाऊन वाद निर्माण करणारे केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी २६ ऑगस्ट रोजी ‘काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’ त्यांची माफी मागितली. १९८० पासून काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाप्रती …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका,… खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र …

Read More »

काँग्रेसच्या आंदोलनावेळी भेट नाकारणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा अखेर १ कोटी रूपयांचा निधी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

मागील आठवड्यात मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेची शाळा खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी करत आंदोलन केले. तसेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून याप्रश्नी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या आंदोलकांना भेट …

Read More »

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची बाईक रॅली दरम्यान युवकाने राहुल गांधी यांना केले किस सुरक्षा रक्षकाने युवकाच्या लगावली कानफटात

रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या पूर्णिया येथे १६ दिवसांची ‘मतदार अधिकार यात्रा’ सुरू ठेवत बिहार यात्रेदरम्यान बुलेट बाईकवरून प्रवास केला. राज्यातील मतदार यादीतील कथित अनियमिततेविरुद्धची मोहीम सुरू होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अररियामध्ये प्रवेश केला तेव्हा मोटारसायकलवरून प्रवास …

Read More »

तेजस्वी यादव यांचा चिराग पास्वानांना सल्ला पण राहुल गांधी म्हणाले, मलाही लागू मतदार अधिकार यात्रेच्या पत्रकार परिषदेत थट्टा मस्करी

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी बिहारच्या अररिया येथे संयुक्त पत्रकार परिषदेत हलके-फुलके देवाणघेवाण केले, तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय गटाच्या ऐक्याचे प्रतिपादन केले. तेजस्वी यांनी एलजेपी (रामविलास) नेते चिराग पासवान यांना लग्नाचा विचार करण्याचा सल्ला दिला. “चिराग पासवान को सलाह देंगे की वो अब शादी …

Read More »

बी सुदर्शन रेड्डी यांचे चंद्राबाबू नायडू यांना आवाहन, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय घ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी एनडीएमधील घटकपक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे वर्णन “देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक” असे केले. तसेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर “राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय” घेण्याचा विश्वास असल्याचे सांगितले. चंद्राबाबू नायडू, ज्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएचा प्रमुख सहयोगी आहे, त्यांनी आधीच सत्ताधारी गटाचे उमेदवार महाराष्ट्राचे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या शाळा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा घाट मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, मंत्री लोढा व सरकारला बांगड्यांचा आहेर

शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. …

Read More »

इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार

सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …

Read More »

बेरोजगार प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह २५ ऑगस्टला रोजगार यात्रा आणि तिरंगा यात्रा

राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा …

Read More »

सचिन सावंत यांची टीका, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ एमसआरडीसीने मुंबईच्या उड्डाणपुलाची जबाबदारी महानगरपालिकेकडे ढकलली

मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …

Read More »