Tag Archives: atul londhe

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा महायुती सरकारने या तरुणाईंच्या स्वप्नांवर, आशा अकांक्षांवर वरवंटा फिरवला आहे. एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीतून थेट अधिकारी होण्याचे तरुणांचे स्वप्न भाजपा सरकारच्या नव्या जीआरमुळे अंधाकारमय झाले आहे. अधिकारी भरतीचे ६०-४० प्रमाण बदलणारा जीआर सरकारने आणला असून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, वीजबील माफी शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी एमएसईबी अदानीला आंदण देण्याचा डाव

शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, मोदी सरकारच्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा परिपाक रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का?

देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे. महागाईची ही झळ इराण युद्धामुळे झाल्याचे चित्र निर्माण करत जनतेने काटकसर व त्याग करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले परंतु ही महागाई केवळ युद्धामुळे नाही तर मोदी …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नारीवंदन आरक्षण २०२४ पासूनच लागू करावं अशी मागणी, का केलं नाही? पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर संसदेचे विशेष अधिवेशन

खऱ्या अर्थानं जर नारी वंदन हा विषय संवेदनशीलता आणि जिव्हाळ्याचा राहिला असता भाजपचा, तर २०२३ साली हे बील जेव्हा पास झालं, त्यावेळेस काँग्रेसनं आग्रह धरला होता की २०२४ पासूनच हे आरक्षण लागू करावं, तेव्हा लागू का नाही केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना अतुल …

Read More »

सचिन पायलट यांची टीका, देशहित गहाण ठेवून कोणताही व्यापार करार मान्य होऊ शकत नाही अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराने भारतातील अन्नदात्याचा गळा घोटला

व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापी स्वीकारार्ह नाहीत. व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार हा दबावाखाली केला असून तो भारतातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा इशारा, शेतकरी, बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्ते निर्धाराने लढले

काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर केवळ राजकारण करत असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आमहत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनतेचे हे प्रश्न हाती …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज १६% ने महाग होणार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची लूट

राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ५ वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात केली जाईल असे सांगितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते १६ टक्क्यांनी महाग होणार आहेत, असा …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीसांनीच फासला हरताळ दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक

राज्यातील जनतेचे वीज बील पुढील पाच वर्षात कमी कमी केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते पण मुख्यमंत्री यांनी आपल्याच शब्दाला बगल देत वीज बील महाग केले आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेली ही वीज दरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोझा आहे, अशी टीका काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, महादेवपुराप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही, बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले IP address, Email ID व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवार यांची धमकी धमकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »