मुंबई : प्रतिनिधी केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून विशेषत: केंद्रातील मोदी कारभारामुळे देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा इशारा अनेक राजकिय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांकडून देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याच इशाऱ्याच्या अनुषंगाने तर वक्तव्य केले नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा नवा शासकिय निर्णय वाचलात का ? मग जाणून घ्या राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कालावधीची मुदत पूर्ण झालेल्या शासकिय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा कालावधी ३१ जुलै ऐवजी ९ ऑगस्ट २०२१ पर्यत वाढविण्यात आला आहे. तर मंत्री, आमदाराच्या शिफारसीनुसार बदल्यांसाठी २० दिवसांचा कालावधी वाढत कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून राज्य सरकारने यासंबधीचा सुधारीत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. यापूर्वी …
Read More »नवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर
मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु एमएमआरडीए आयुक्त ए.राजीव हे निवृत्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील आदेश होईपर्यत पदावनत न करता पदोन्नती मिळणार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या रिक्त जागा भरणार
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नसल्याने राखीव आणि खुल्या प्रवर्गातील सर्व जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या यादीत वरच्या स्थानी आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदावनत न करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला असून त्यासंबधीचा आदेश …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे शिफ्टनुसार नियोजन करण्याचे मुख्य सचिवांनी दिले आदेश कोविड-१९ चे नियम पाळण्यासाठी आवश्यक ते निर्णय घ्या
मुंबईः प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयीन कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येत असल्याने कोविड-१९ नियमावली पाळली जात नसल्याचे दिसून आल्याने मंत्रालयातील वाढता कोरोना प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने योग्य ते आवश्यक निर्णय घ्यावेत असे आदेश राज्याचे …
Read More »अबब.. मंत्रालयातील ३५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा महसूल विभागात २३ तर शिक्षण विभागात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
मुंबईः प्रतिनिधी राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात महसूल विभागात ३ कर्मचारी आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा आज २३ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर शिक्षण विभागातील १२ जणांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महसूल विभागात आज …
Read More »मंत्रालयात सापडले आणखी २ बाधित रूग्ण एकाची प्रकृती चिंताजनक
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील एक शिपाई आणि टंकलेखक लिपीक कोरोना बाधीत सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात पहिल्यांदा शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे ८ जुलै रोजी आढळून आले. त्यानंतर …
Read More »मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आमदार गजभिये आणि प्रविण भोटकर यांच्या प्रयत्नांना यश
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणाचाच नव्हे तर प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणून मंत्रालय असून या मंत्रालयाच्या इमारतीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले नव्हते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि सामाजिक कार्यकर्त्ये प्रविण भोटकर यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर डॉ. आंबेडकरांचे आणि संविधानाचे प्रस्ताविका बसविण्यात येणार आहे. याचे …
Read More »मंत्रालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावली “उपहारगृह” ची माणूसकी…! १२ जणांनी एक हजारहून अधिक व्यक्तींच्या जेवणाची केली व्यवस्था
मुंबईः प्रतिनिधी मुंबईत कालपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा आज बुधवारी भलताच मुंबईकरांना फटका बसला. ऐरवी सकाळी सुरु झालेले मंत्रालय संध्याकाळी रिकामे होते. मात्र या अतिवृष्टीचा परिणाम शहरातील सर्वच वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना मंत्रालयातच थांबण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र या अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपगृहातील कर्मचाऱ्यांच्या माणूसकीने धाव घेत या सर्वांची अल्प दरात …
Read More »रात्रौ १.३० वाजता सापडली मंत्रालयात महिला मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलास तैनात करण्यात आले आहे. मात्र याच सजग पोलिसांच्या तैनातीतही काही दिवसांपूर्वी माहिती चोरी (डेटा चोरी) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रात्री १.३० वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा …
Read More »
Marathi e-Batmya