रात्रौ १.३० वाजता सापडली मंत्रालयात महिला मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलास तैनात करण्यात आले आहे. मात्र याच सजग पोलिसांच्या तैनातीतही काही दिवसांपूर्वी माहिती चोरी (डेटा चोरी) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रात्री १.३० वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीच्या निमित्ताने जवळपास सर्वच मंत्री मंत्रालयात असतात. त्यामुळे राज्यातील हजारो लाखो नागरीक मंत्रालयात येत असतात. मात्र यावेळी एक महिला मंत्रालय बंद झाल्यानंतरही तशीच मंत्रालयात थांबून राहिली. तसेच ही महिला मंत्रालयाच्या ४ था, ५ वा आणि ७ व्या मजल्यावर फिरत राहीली. रात्री १.३० च्या सुमारास कर्तव्यावर असलेले पोलिस गस्त घालण्याच्या निमित्ताने फिरत असताना सदर महिला एकटीच फिरत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेत मरिन्स लाईन्स पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आल्याचे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.
सदर महिला ही मुंबई बाहेरील असून तीचे आडनाव शिंदे असे आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सदर महिला मंत्रालयात आली होती. मात्र मुख्यमंत्री काही भेटले नसल्याने सदर महिला मंत्रालयातच थांबली. रात्री गस्तीचे पोलिस मंत्रालयात फिरत असताना ती एकटीच सापडल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही दोनवेळा अशाच महिला रात्रीच्या मंत्रालयात सापडल्याचे अन्य एका पोलिसाने सांगितले.

About Editor

Check Also

राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, त्यांना आंब्यावर बोलायला वेळ होता सीबीएसईच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅनिंगच्या घोळामुळे गोंधळ

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इयत्ता १२वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीसाठीच्या बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *