ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात २५ टक्क्यांनी वाढ मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. या विभागाच्या महसूलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच अवैध मद्य निर्मिती व वाहतूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थांबवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. …
Read More »प्रसारमाध्यमातील जाहिरात कोणी दिली? शंभूराज देसाई म्हणाले, तो अज्ञानी…अज्ञात आहे…
राज्यातील बहुतांश वर्तमान पत्रांमध्ये आज मंगळवारी १३ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याची भली मोठी जाहिरात पाहून भाजपामधील अनेक नेत्यांना धक्का बसला. त्यातच ही पसंतीची आकडेवारी एका सर्व्हेद्वारे मिळाली असल्याचा दावाही या जाहिरातीमध्ये करण्यात आली. मात्र या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात …
Read More »एच. के. पाटील म्हणाले, …भाजपामुक्त महाराष्ट्रचा काँग्रेसचा निर्धार
कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिकचे बळ मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला …
Read More »त्या जाहिरातीवरून अजित पवार यांचे खुले आव्हान, तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर…मैदानात या
आता शिवसेना आमचीच अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही जनतेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबरोबर कंत्राटी ग्रामसेवक, पुर्नगृह आदी घेतले महत्वाचे निर्णय
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले हे महत्वाचे निर्णय… बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे …
Read More »शालेय विद्यार्थ्यांसाठी खुषखबरः या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ
पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती …
Read More »अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील. अनुसूचित जातीच्या …
Read More »स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात देशाची चूक होती का?
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि सरकारच्या अजेंड्याशी असहमत असलेल्या सर्व नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदीसरकार करत असल्याचे आता स्पष्ट झाले असून स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात देशाची चूक होती का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एखाद्या विशिष्ट सरकारी धोरणावर टीका …
Read More »जॅक डोर्सींच्या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर प्रत्युत्तर देताना म्हणाले….
शेतकरी विरोधी कायद्यावरून आंदोलन पुकारलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन जीवी, खलिस्तानवादी यासह अनेक विशेषण देत मोदी सरकार आणि भाजपाने या आंदोलनाला चिरडूण टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप करत एका मुलाखतीत म्हटलं की, २०२०-२१ मध्ये भारत सरकारने शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई …
Read More »
Marathi e-Batmya