Breaking News

नाना पटोले यांची टीका, लोकशाहीमध्ये ‘मन की…’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते महागाई, बेरोजगारी, बँक लुटेरे, कर्नाटकातील ४०% च्या भ्रष्ट सरकारवर ‘मन की बात’ कधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’चे १०० भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची दादागिरी, महिला कुस्तीपटूंवर भाजपा खासदाराने केलेले लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील ४०% भ्रष्ट सरकार, बँक लुटेरे, …

Read More »

अजित पवारांच्या स्पष्टोक्तीनंतर जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य, पुढचा मुख्यमंत्री ठरला… आमचा पक्ष महाविकास आघाडीत मोठा

काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याची आणि राज्याच्या नेतृत्वबदलाची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली. त्यातच एका जाहिर कार्यक्रमात अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसायला आवडेल का असा प्रश्न …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पडली पार, पण विद्यार्थ्यांना हजेरीच लावता आली नाही आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी परिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेला उपस्थित राहुनही आपली हजेरी दाखविता आली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीकडून महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी या उद्देसाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे …

Read More »

तुरूंगातून बाहेर पडताच सत्यजीत चव्हाण यशवंतराव प्रतिष्ठानवर, शरद पवार म्हणाले…. माती परिक्षण थांबविल्याशिवाय आणि फौजफाटा हटविल्याशिवाय बारसूप्रकरणी चर्चा नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी रविवारी (३० एप्रिल) ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते. शरद पवार …

Read More »

व्यासंगी पण कामाप्रती निष्ठा ठेवणारे व्यक्तीमत्वः मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या बद्दल भावना व्यक्त करणारा उपसचिव अजित देशमुख यांचे मनोगत

राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. सुमारे सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सनदी सेवेनंतर सर सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय सेवेतील हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या कामातून उच्च प्रतीचे प्राविण्य सिद्ध केलेच पण या परिघाबाहेर आपल्या कलासक्त, स्थितप्रज्ञता, क्षमाशीलता सुसंस्कृतता, …

Read More »

राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर, त्यांचा विश्वास ४० टक्के कमिशनवर मोफत देण्याच्या आश्वासनावरील टीकेवर पंतप्रधान मोदींची टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी पार पडली जाणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांच्यात लढाई होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्यातच काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका …

Read More »

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळलीः दोघांचा मृत्यू तर ७ जण जखमी ४० ते ५० नागरीक अडकल्याची भीती

भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मिळवलेले यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा दाखवून देणारा ७५ बाजार समित्या मविआच्या ताब्यात

बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी जयंत पाटील म्हणाले, गेल्या …

Read More »

नारायण राणे यांचा उध्दव ठाकरे यांना इशारा, येऊ द्या त्यांना कोकणात… ५ कोटी अॅडव्हान्स दिले ५०० कोटींचा व्यवहार झाला

कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. याप्रकल्पावरून समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. नाणारमधील रिफायनरी रद्द झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसू जागेचा पर्याय दिला होता, असा दावा उदय सामंत यांनी केला. मात्र, आता बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेनेही विरोधी केला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी …

Read More »