Breaking News

ते पत्र दाखवत उदय सामंत यांची टीका, ह्याला म्हणतात दुटप्पीपणा….. बारसू आंदोलन पेटल्याने राजकिय वातावरण तापले

नियोजित नाणार येथील रिपायनरी प्रकल्प स्थलांतरीत करून तो राजापूर तालुक्यातील बारसू येथे घेण्यात आला. मात्र आता बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सोमवारी रात्रीपासून स्थानिक नागरिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होते. आज प्रकल्पस्थळावरील माती …

Read More »

फडणवीसांचे दुर्लक्ष; अखेर संजय राऊत यांनी ठोठावला सीबीआयचा दरवाजा आता सीबीआय चौकशी करणार का?

काही दिवसांपूर्वी भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना घोटाळाप्रकरणी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत कागदपत्रासह आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी करण्याचे आवाहन केले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संजय राऊत यांनी थेट सीबीआय यंत्रणेचा दरवाजा ठोठावत भीमा-पाटस सकारी साखर …

Read More »

स्थानिकांचा विरोध डावलून अखेर बारसूत रिफायनरी प्रकल्पासाठी माती परिक्षण पोलिसांच्या सौम्य लाठिमारानंतरही स्थानिक विरोधकांचे ठिय्या आंदोलन

२०१४ साली राज्यात आणि केंद्रात भाजपाच्या नेत़ृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर कोकणातील नाणार येथे रिफानरी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा कऱण्यात आली. मात्र त्यास स्थानिक नागरिकांबरोबरच राजकिय नेत्यांचा विरोध वाढल्याने अखेर नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्दबातल करण्यात आला. त्यानंतर सदरचा प्रकल्प हा राजापूर तालुक्यातील बारसू सोलगावात स्थलांतरीत कऱण्यात आला. मात्र या …

Read More »

पाकिस्तानी स्तंभलेखक तारेक फतेह यांचे निधनः आरएसएसने ट्विट करत वाहिली श्रध्दांजली कर्करोगाशी झुंज देत ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रख्यात पाकिस्तानी स्तंभलेखक आणि लेखक तारेक फतेह यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तारेक फतेह मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी संघर्ष करत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते ७३ वर्षांचे होते. त्यांचं कॅनडामध्ये निधन झालं असून त्यांची मुलगी नताशा फतेह यांनी याची पुष्टी केली. “पंजाबचा सिंह… हिंदुस्थानचा पुत्र… कॅनडा …

Read More »

१५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये

शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पत्रकारांनी …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा खुलासा, कोणताही अन्य डेटा लिक नाही सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास …

Read More »

‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे गौरवद्गार

‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार मदतः पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या मंत्र्याने लगावला टोला, ते अंतरयामी झाले का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हलविण्याची पडद्यामागे हालचालीच्या वक्तव्यावर लगावला टोला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरु असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला अपेक्षित असलेले जनमत निर्माण करण्यात शिंदे हे कमी पडत असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या त्या गौप्यस्फोटावर खोचक …

Read More »