Breaking News

झोमॅटोच्या सीईओ पदावरून दीपेंद्र गोयल पाय उतार, धिंडसा यांच्यावर जबाबदारी अंतर्गत मूळ कंपनी एटर्नलच्या उच्च व्यवस्थापनात बदल

झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या एटर्नलने बुधवारी उच्च व्यवस्थापनात बदलाची घोषणा केली, ज्यात संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार झाले आहेत. गोयल आता उपाध्यक्षपदाची भूमिका स्वीकारतील आणि कंपनीच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून कायम राहतील. ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर सिंग धिंडसा यांची नवीन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून अनुभवला पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार ऑनलाईन पद्धतीने अनुभवला देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा अनुभव

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला …

Read More »

भाजपाला अखेर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळाला, बिहारचे नितीन नबीन यांच्याकडे धुरा जे पी नड्डा यांना अखेर मिळाला पर्याय

भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) कार्याध्यक्ष नितीन नबीन यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी, डॉ. के. लक्ष्मण यांनी आज नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात ‘संगठन पर्व’ कार्यक्रमात नितीन नबीन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आणि त्यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर सादरीकरण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली राज्य शासनाची भूमिका

महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत ‘राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण …

Read More »

२००५ साली चर्चा होती ‘शिवसेना संपली.’… यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्व. प्रमोद नवलकर यांचा लेख मोरारजी नावाच्या एका गांधीवाद्याने शिवसेना संपवण्याची घोषणा करून एका शिवसैनिकाला माहीमच्या नाक्यावर चिरडले

२००५ साली बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोद महाजन आणि मनोहर जोशी यांनी त्यांना ‘मातोश्री’वर जाऊन सकाळीच शुभेच्छा दिल्या. त्यावेळी एक अतिशय सुंदर छायाचित्र स्वतः उद्धव ठाकरे यांनी काढले. यावर स्व. प्रमोद नवलकर यांनी शिवसेनेवर हृदयस्पर्शी लेख लिहिला… शिवसेना अभेद्य ! काहीजण रोज उठल्याबरोबर घोषणा करायची, ‘शिवसेना संपली’ आणि झोपताना प्रार्थना करायाची …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींकडून राजमाता अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान हिंदुच्या अस्मितेवर घाला घालणारे हे कसले हिंदुत्ववादी ?

राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र आज अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार

भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध …

Read More »

शशी थरूर यांचे मत, केरळमधील दलितांवर नारायण गुरु यांचा प्रभाव डॉ आंबेडकर यांच्यापेक्षा जास्त द हिंदू लिटररी फेस्टीवलमध्ये व्यक्त केले मत

केरळमधील दलितांच्या जीवनावरील नारायण गुरूंचा प्रभाव, परिणाम आणि यश हे उत्तर भारतातील डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्यापेक्षा निःसंशयपणे अधिक सखोल आणि परिवर्तनकारी होते, असे मत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी रविवारी (१८ जानेवारी, २०२६) चेन्नई येथे ‘द हिंदू लिट फॉर लाइफ’ कार्यक्रमात सांगितले. ‘हिंदू धर्माची पुनर्कल्पना करणारे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार

‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात …

Read More »

यूएईचे राष्ट्राध्यक्ष दोन तासांच्या भारत भेटीवर पण पंतप्रधान मोदी स्वतः विमानतळावर प्रोटोकॉल तोडून गळाभेट आणि घनिष्ठ संबध असल्याचे दाखवले

यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सुमारे दोन तासांच्या भेटीसाठी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले, यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल मोडून विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेते एकमेकांना आपुलकीने मिठी मारताना दिसले, या कृतीने गेल्या काही वर्षांत भारत-यूएई संबंधांची ओळख बनलेल्या घनिष्ठ वैयक्तिक संबंधांना अधिक दृढ केले. ही भेट संक्षिप्त …

Read More »