टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. रामगिरी येथे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी …
Read More »नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाखाच्या रकमेस मंजूरी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले, …
Read More »आत्महत्या ग्रस्त कराड कुटुंबीयांची मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली सांत्वनपर भेट ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया लढू - मंत्री छगन भुजबळ
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत
मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …
Read More »सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणीः गृहसचिवांना प्रतिज्ञा पत्र दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश राज्याच्या गृहसचिवांना ३ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने राज्य शासनाला फटकारत राज्याच्या गृहसचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने चौकशी केल्यावर पुढे काय कारवाई करायची? याविषयी कायद्यात कोणतीही तरतूद नाहीये. त्यामुळे अशा …
Read More »ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अधिसूचना जाहिर जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती-उपसभापती पदासाठीचे आरक्षण जाहिर
मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूका आणि त्यावरील अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती-उपसभापती यांच्या निवडणूका होणार आहेत. या पदासाठी ग्रामविकास विभागाने चक्रकार पद्धतीने सोडत काढत …
Read More »राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून म्हणाले, ते चालले आहेत ठिक आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून केली टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या आगामी भेटीवरुन खोचक टीका केली. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरवात झाल्यानंतर आता दोन वर्षांनी, या पंतप्रधान मोदी यांचा दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा आता …
Read More »अखेर पंतप्रधान मोदी हे मणिपूरला उद्या भेट देणार, पण विविध कार्यक्रमांसाठी मणिपूर जळून खाक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी निघाले पण कार्यक्रमानिमित्ताने
२०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूरला भेट देणार आहेत. २०० हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या वांशिक हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ, विरोधकांनी पंतप्रधानांवर संघर्षग्रस्त ईशान्येकडील प्रदेशातील परिस्थितीचा वैयक्तिक आढावा घेण्यासाठी राज्याला भेट न दिल्याबद्दल सातत्याने टीका केली. पण या दोन …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, फटाके बंदी फक्त दिल्लीत नको तर देशभरात हवी प्रदुषणमुक्त हवेचा अधिकार सर्वांना
शुक्रवार (१२ सप्टेंबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदविले की, फटाक्यांवरील बंदी केवळ राष्ट्रीय राजधानी दिल्लीपुरती मर्यादित नसावी, तर देशभरातील लोकांना प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई पुढे म्हणाले की, म्हणून संपूर्ण देशासाठी एक धोरण तयार केले पाहिजे. जर फटाक्यांवर बंदी घालावी लागली तर ते संपूर्ण …
Read More »भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथे करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता हा ‘मराठी दांडिया’ होणार असून यावेळच्या दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमीत साटम, मराठी दांडियाचे आयोजक व भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. …
Read More »
Marathi e-Batmya