घाऊक महागाई सलग पाचव्या महिन्यात नकारात्मक ऑगस्टमध्ये दर ०.५२ टक्के

ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई वाढून -०.५२ टक्के झाली आहे. जुलै महिन्यात हा दर -१.३६ टक्के होता. सलग पाचव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर नकारात्मक राहिला आहे. म्हणजेच हा दर शून्याच्या खाली गेला आहे. त्याचवेळी ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त झाले आहेत. अन्नधान्य महागाई ७.७५ टक्क्यावरून ५.६२ टक्क्यांवर आली आहे.

अन्नधान्य महागाईचा दर कमी

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये अन्नधान्य महागाई ७.७५ टक्क्यावरून ५.६२ टक्क्यांवर आली आहे. तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर ७.५७ टक्क्यांवरून ६.३४ टक्क्यांवर आला आहे. इंधन आणि विजेचा घाऊक महागाई दर -१२.७९ टक्क्यांवरून -६.०३ टक्क्यांपर्यंत आणि उत्पादित उत्पादनांचा महागाई दर -२.५१ टक्क्यांवरून -२.३७ टक्क्यां पर्यंत वाढला आहे. याशिवाय भाज्यांच्या महागाईचा दर ६२.१२ टक्क्यांवरून ४८.३९ टक्क्यांवर आला आहे.

सामान्य माणसावर परिणाम

घाऊक महागाईत दीर्घकाळ वाढ झाल्यामुळे बहुतांश उत्पादक क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होतो. घाऊक किमती जास्त काळ चढ्या राहिल्यास, उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ कराद्वारेच घाऊक महागाई नियंत्रित करू शकते.

उदाहरणार्थ, कच्च्या तेलात तीव्र वाढ झाल्याच्या परिस्थितीत सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. मात्र, सरकार एका मर्यादेतच कर कपात कमी करू शकते. घाऊक महागाई निर्देशांकामध्ये धातू, रसायन, प्लास्टिक, रबर या कारखान्याशी संबंधित वस्तूंना अधिक महत्त्व दिले जाते.

नकारात्मक चलनवाढीचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम

महागाई नकारात्मक असल्याने अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. याला डिफ्लेशन म्हणतात. जेव्हा वस्तूंचा पुरवठा त्या वस्तूंच्या मागणीपेक्षा जास्त होतो तेव्हा नकारात्मक चलनवाढ होते. त्यामुळे किमती घसरतात आणि कंपन्यांचा नफा कमी होतो. जेव्हा नफा कमी होतो तेव्हा कंपन्या कामगारांना काढून टाकतात आणि त्यांचे काही प्लांट किंवा स्टोअर बंद करतात.

About Editor

Check Also

राजशिष्टाचार विभाग आणि ‘एसआयडीएम’, ‘सीआयआय’मध्ये सामंजस्य करार संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात करार करण्यात आला

राजशिष्टाचार विभागाची परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय संपर्क शाखा (पीएफडीओ) आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *