सुषमा अंधारे यांचा इशारा……अन्यथा शिवसेना उबाठा निवडणुकीवर बहिष्कार टाकेल महानगरपालिका निवडणुका बॅलेट पेपरद्वारे न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू

विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फारशी मते मिळाली नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महायुतीच्या पक्षांना संशयातीत मतदान होत पाशवी बहुमत मिळाल्याचे निवडणूकीच्या निकालात दिसून आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदानासाठी ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्याऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मतपत्रिकेचा वापर न केल्यास शिवसेना उबाठा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीवर बहिष्कार घालेल असा इशारा निवडणूक आयोग आणि राज्य सरकारी यंत्रणेला दिला.

मुंबई विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने इशारा दिला. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक महापालिकांच्या निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत, तसे न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असेही यावेळी जाहिर केले.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्या देशात हुकूमशाहीचे वातावरण आहे, ईव्हीएममुळेच निवडणूक घेण्याची मागणी सर्वांची आहे. विरोधी पक्षांनी आगामी महापालिका निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात अन्यथा आमचा पक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकेल.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ईव्हीएमच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, जेव्हा विरोधक निवडणूक जिंकतात तेव्हा ते ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उभे करतात सभा आणि एकनाथ शिंदे यांनी झारखंडमधील विरोधकांच्या विजयाचा हवाला दिला.

About Editor

Check Also

बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *