तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांवर जाहीर हल्ला करण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच काँग्रेसच्या हायकमांडपर्यंत पोहोचलेला राजकीय वाद यामुळे अधिकच चिघळला आहे. गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सुरेखा यांना हटवण्याची शिफारस तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांना पाठवण्यात …
Read More »आजपासून पेट्रोलच्या दरात वाढ पेट्रोल निर्यात शुल्क १.५ रूपये प्रति लिटर
सरकारने मंगळवारी (१ सप्टेंबर, २०२६) पेट्रोल निर्यात आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वर पुन्हा शुल्क लागू केले आहे. सरकारने पेट्रोलवर ₹१.५ प्रति लिटर दराने निर्यात शुल्क पुन्हा लागू केले आहे, मात्र डिझेलवरील निर्यात शुल्क ₹२४ प्रति लिटरवर अपरिवर्तित आहे. पेट्रोल निर्यातीवरील शुल्क १ सप्टेंबरपासून प्रति लिटर १.५ रुपये करण्यात आले …
Read More »आयआयएम अहमदाबादच्या प्लेसमेंट मध्ये एक नवीन विक्रम, २.३१ कोटी रुपयांची एकास नोकरी २०१४ मध्ये नोंदवलेला १,९२,५८१ अमेरिकन डॉलर्स प्लेसमेंटचा विक्रम मागे
आयआयएम अहमदाबादने आपल्या आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या प्रमुख पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम (PGP) च्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वाधिक कमाल कमाई क्षमता (MEP) २,४३,००० अमेरिकन डॉलर्स (USD) म्हणजेच जवळपास २.३१ कोटी रुपये नोंदवली आहे. इंडियन प्लेसमेंट रिपोर्टिंग स्टँडर्ड्स (IPRS) च्या अहवालानुसार, २०११ मध्ये IPRS प्रणाली सुरू झाल्यापासून संस्थेने …
Read More »पाकिस्तानचे क्षुद्र चाळे, शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या फोटोतून पंतप्रधान मोदी गायब दुसऱ्या फोटोत मात्र मोदी सह सर्व नेते फोटोत
पाकिस्तानने, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान सोशल मीडियावर क्षुद्र चाळे केले. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शेअर केलेल्या एससीओ SCO नेत्यांच्या ग्रुप फोटोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वगळण्यात आले होते. या क्रॉप केलेल्या फोटोमध्ये चतुराईने शहबाज शरीफ यांना मध्यभागी ठेवण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या …
Read More »माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचीची गळफास घेऊन आत्महत्या नैराश्याने ग्रस्त असल्याने केली आत्महत्या
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असे पोलिसांनी सांगितले. २८ वर्षीय भाची ब्रिस्ती मुखर्जी घटक यांचा मृतदेह सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामपूरहाट येथील त्यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आढळला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर रामपूरहाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी …
Read More »आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५
नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ …
Read More »अरविंद केजरीवाल यांची टीका, निवडणूक आयोग एसआयआरच्या माध्यमातून देशाची लोकसंख्या कमी करतेय दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीच्या मतदार यादीच्या मसुद्यातून ४७ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सुमारे दीड कोटी मतदारांपैकी ४७ …
Read More »जागतिक बँकेच्या लवादाचा निर्णय सिंधू पाणी करार अंमलात राहणार, भारताची स्पष्ट भूमिका पाणीवाटप स्थगित जागतिक बँकेच्या लवाद बेकायदेशीर गठित केल्याची भारताची भूमिका
भारताने सोमवारी जागतिक बँकेने गठित केलेल्या सिंधू पाणी करारासंबंधीच्या लवादाचा निकाल फेटाळून लावला. या संस्थेला “बेकायदेशीरपणे गठित” म्हटले असून, पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचा भारताचा निर्णय “कायमस्वरूपी लागू” असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंधू पाणी करार अंमलात राहील असा निकाल लवादाने दिल्यानंतर आणि भारताला जम्मू आणि काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पाचे काम मर्यादित ठेवण्यास …
Read More »नेपाळच्या पुरातील चार मृतदेह उत्तर प्रदेशातील नारायणी-गंडक नदीत सापडले डीएनए केल्यानंतर सदर मृतदेह नेपाळकडे हस्तांतरीत केले
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील नारायणी-गंडक नदीतून सापडलेले चार अज्ञात मृतदेह शवविच्छेदनानंतर नेपाळ प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. नेपाळमधील भीषण पुराच्या परिणामांना सीमेच्या दोन्ही बाजूंचे अधिकारी तोंड देत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन महिला आणि एका पुरुषाचे हे मृतदेह महाराजगंज जिल्हा रुग्णालयाच्या …
Read More »नेपाळच्या पूरात आतापर्यंत ९०३ जणांचा मृत्यू तर ४२०० जण अद्याप बेपत्ता आधुनिक बचाव साधनांच्या अभावामुळे धोकादायक भूभागातील बचावकार्य अधिक कठीण
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पूरानंतर बचाव आणि मदतकार्य करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विशेष उपकरणे, बॉडी बॅग, दोरखंड आणि हेलिकॉप्टरच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडक कोसळल्याने किंवा हिमस्खलनामुळे हा पूर आला असावा, असे मानले जाते. या पुरामुळे भोटेकोशी नदीच्या पात्रात …
Read More »
Marathi e-Batmya