भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल असे दिसत आहे. विधेयकातील तरतुदी पाहता महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काहीही नाही. महिला आरक्षण कायदा झाला …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडताना म्हणाले,… नारिशक्ती बंधन अधिनियम विधेयक सर्व पक्षाच्या खासदारांनी मंजूर करण्याचे केले आवाहन
मागील अनेक वर्षापासून देशात आणि सर्व राजकिय पक्षांकडून सातत्याने महिला आरक्षण विधेयक लागू करण्यासंदर्भात सातत्याने चर्चा करण्यात येत होती. त्यातच काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना राज्यसभेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडत मंजूर करण्यात आले. मात्र लोकसभेत या विधेयकाला मुहूर्त लागत नव्हता. अखेर संसदेच्या नव्या इमारतीच्या …
Read More »नव्या संसदेतील पहिल्याच संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी दिले नव्या भारताचे संकेत गणेशचतुर्थी आणि मिच्छामी दुःखड्म
२०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे जायला आणखी कालावधी असताना निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून विशेष अधिवेशन नव्या संसद इमारतीत घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत आज सुरुवात करण्यात आली. यावेळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित करण्याची परवानगी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशचतुर्थीचे महत्व …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी नाही नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी उपमुख्यमंत्र्यांची भेट
ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त “नमो ११ कलमी कार्यक्रम” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सुभेदारी विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात …
Read More »नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतरही महाराष्ट्राच्या सुपुत्राला विमान उद्योगाला जमिन मिळेना मेक इन इंडियासाठी परदेशी उद्योगांना जमिन देता मग महाराष्ट्राच्या सुपुत्राला कधी?
मागील काही वर्षात देशाच्या विकासासाठी आणि वायु दलाची ताकद वाढविण्यासाठी कधी अमेरिका तर कधी फ्रांस तर कधी जर्मनीकडून विमाने केंद्र सरकारकडून खरेदी केली जातात. त्यावर कोट्यावधी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जातो. मात्र परदेशी दर्जाची पूर्णतः भारतीय असलेल्या एका विमान उत्पादन करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार …
Read More »मराठवाड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले महत्वाचे निर्णय छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या बैठकीत घोषणांचा पाऊस
राज्यातील मराठवाडा मुक्ती संग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजी नगर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. आज झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालील प्रमाणे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार सुप्रशासन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
स्वराज्य मॅगझीनच्यावतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाँडेचेरीत ‘पाँडी लिट फेस्टिव्हल’मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वराजचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न विश्वनाथन आणि संपादकीय संचालक …
Read More »अंबादास दानवे यांचा टोला, मागील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा अजूनही अपूर्णच ४१ हजार कोटींच्या घोषणा अद्यापही अपूर्णच
२०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती.या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ४१ हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत …
Read More »पायाभूत विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
राष्ट्राच्या प्रगतीत पायाभूत सुविधांची उपलब्धता अत्यावश्यक बाब आहे. या विकास कामांच्या उभारणीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या व्यापक जबाबदारीच्या जाणिवेने सर्वांनी गुणवत्तापूर्ण काम करत उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी आयोजित “उत्कृष्ट …
Read More »
Marathi e-Batmya