Tag Archives: तुषार गांधी

नसीम खान यांचा इशारा, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी

नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर चांदिवली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य विजयी ‘तिरंगा मार्च’ काढण्यात आला. या तिरंगा मार्चचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मंत्री आरिफ नसीम खान तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

मिनाक्षी नटराजन यांचा आरोप, वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाहीवरच मोठा अन्याय, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज: हर्षवर्धन सपकाळ

देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क …

Read More »

तुषार गांधी यांचे आवाहन, रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन

मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत  समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश …

Read More »

महाडमध्ये काँग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. …

Read More »

इंडिया ब्लॉक जाहिर केला बिहार निवडणूकीचा जाहिरनामा तेजस्वी यादव, तुषार गांधी आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत जाहिरनामा प्रसिद्ध

इंडिया ब्लॉकने मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले. ३२ पानांचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ (तेजस्वी यांचा संकल्प) एका गर्दीच्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, रा. स्व. संघाने प्रतिगामित्वामध्ये लपलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार रा. स्व. संघाच्या काळ्या टोपीचा; राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे असे …

Read More »

२९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’ काँग्रेसचा उद्या २८ सप्टेंबरला नागपूरात मशाल यात्रा व जाहीर सभा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला पवित्र असे संविधान देऊन सर्व जाती धर्मांना जगण्याचे हक्क व अधिकार दिले पण मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने संविधान व गांधी विचार स्विकारावा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दिक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा; रा. स्व. संघाला संविधान भेट देणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

तुषार गांधी यांचा इशारा, देशद्रोह्यांना उघडं पाडण्याचा निर्धार कायम, आरएसएस म्हणजे विष केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका

मागील काही काळात संपूर्ण देशभरातच धार्मिक तणाव वाढीस लागला आहे. त्यातच यातील अनेक प्रकरणांच्या मुळांची सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाची मातृसंस्थाच जबाबदार असल्याचे पाह्यला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे नातू ततुथा गांधीवादी विचारांचे तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवर संघाच्या निषेधाला न घाबरता टी करताना म्हणाले की, देशद्रोह्यांना उघडं …

Read More »

वंचित बहुजन आघाडीची टीका, तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही

महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता त्यांचे पणतू तुषार गांधी यांनाही वंचित आणि बहुजनांच्या पक्षाने निवडणूक लढवावी आणि त्यांच्या जवळही स्वतंत्र राजकीय विचार आणि नेतृत्व असावे, असे वाटत नसल्याचा थेट हल्ला वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून केली. यामध्ये पुढे म्हटले आहे की, महात्मा गांधींना …

Read More »