जवळपास ४० वर्षानंतर भारताला अर्थात इंडियाला जी-२० चे फिरते अध्यक्ष पद मिळाले. पण या अध्यक्षपदाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेच्या निवडणूका नजेसमोर ठेवून केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगली असतानाच जपानच्या एका प्रसारमाध्यमाने त्याविषयीची एक बातमीच दिल्लीतून दिली. त्याशिवाय आज जी-२० च्या बैठकीस सुरुवात होताच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतावेळी मोदींबरोबर …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभारला सहाव्या दिवशीही काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला जनतेचा दांडगा प्रतिसाद
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारने देशात सुईपासून रॉकेट पर्यंतचा विकास केला. चंद्रावर चांद्रयान-३ सोडले त्या इस्रोची स्थापनासुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातच झाली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले पण या सरकारने मागील ९ वर्षात नवीन काहीच उभे केले नाही. उलट काँग्रेस सरकारने उभे केलेल्या सर्व बँका, रेल्वे, विमानतळे, विमा कंपन्या विकून टाकल्या. देश …
Read More »भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापनदिनी काँग्रेसच्या राज्यभर पदयात्रा व जाहीर सभा LPG गॅसच्या किंमतीतून मोदी सरकारने जनतेला लुटल्याचा पर्दाफाशही करणार
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर सर्व जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून पहिला वर्धापन …
Read More »राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका
लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. …
Read More »OneNationOneElection साठी समिती स्थापल्याचे भारत राजपत्र प्रसिध्द माजी राष्ट्रपती राम कोविंद प्रमुख यांच्या नेतृत्वात अमित शाह यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समितीत समावेश
आगामी लोकसभा निवडणूकीला काही महिन्यांचा अवधी राहिलेला आहे. परंतु २०१४ च्या आधी भारतात संसदीय प्रणाली ऐवजी अध्यक्षीय प्रणाली लागू करावी यासाठी उच्चभ्रु वर्तुळात संवाद-सत्रे आयोजित करणाऱ्या भाजपाकडून अखेर one nation one election अर्थात एक देश एक निवडणूक प्रणाली लागू करण्याच्या उद्देशाने अखेर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्री अमित …
Read More »राहुल गांधी म्हणाले, नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान…. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?
काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस हा बब्बर शेर आणि शेरनिंयोका पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. आम्ही …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती , ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेला मूर्त स्वरूप देण्याची वेळ महायुतीच्या कार्यक्रमात अजित पवार यांचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्याने कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, १ मिलियन पैसा कोणाचा, चिनी व्यक्तीची गुंतवणूक भारतात कशी ? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हे मुंबईत आले होते. त्यावेळी बांद्रा येथील ग्रॅड ह्यात हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन वर्तमानपत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती …
Read More »शरद पवार यांचे आव्हान, पंतप्रधानांनी नुसतेच आरोप करण्याला काय अर्थ… अजित पवार सोडून गेलेल्यावर केले भाष्य
आज इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने बैठकीशी संबधित चर्चेची रूपरेखा आणि तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यावरून अद्यापही संशय असल्याचा …
Read More »काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती
महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …
Read More »
Marathi e-Batmya