लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा देशातील जनतेने भाजपाला मतदान करत पुन्हा केंद्रातील सत्तेत विराजमान केले. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सबका साथ सबका विकासचा नारा दिला खरा मात्र या सरकारने एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काढून घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना …
Read More »काँग्रेसची मागणी, मुख्य निवडणूक आयुक्तांची निवडीची प्रक्रिया पुढे ढकला निवडीच्या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान
मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) यांची निवड पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारला केली. निवडणूक आयोगाच्या निवड समितीमध्ये मुख्य न्यायाधीशांच्या जागी गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या केंद्राच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयाचा हवाला देत काँग्रेसने हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल …
Read More »वक्फ विधेयकावरून संसदेत गोंधळ, सत्ताधारी आणि इंडिया आघाडीचे सदस्य आमने-सामने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आश्वासनानंतरही विरोधकांचा अखेर सभात्याग
गुरुवारी मांडण्यात आलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वरील संयुक्त समितीच्या अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए आणि विरोधी खासदारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी निषेध नोंदवला, खासदारांनी दावा केला की अंतिम अहवालातून असहमतीच्या नोट्सचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. लोकसभेत, वक्फ मालमत्तेची नोंदणी सुलभ करण्याच्या …
Read More »काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, अर्थसंकल्प म्हणजे…. बिल्ली चली हज को मध्यवर्ग आणि इतर घोषणांवरून खर्गे यांची अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदींवर टीका
केंद्रातील भाजपा प्रणित नव्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. यावेळी १२ लाखाचे उत्पन्न कमाविणाऱ्या नव्या मध्यमवर्गाला दिलासा देत १२ लाख रूपये कमविणाऱ्या नोकरदारांचे उत्पन्न करमुक्त असल्याचे जाहिर केले. यावरून आणि एकदंरच अर्थसंकल्पातील विविध तरतूदींवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदी …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आरोप, व्हिआयपी कल्चरमुळे घटना कुंभमेळ्यात अर्धवट व्यवस्था आणि व्हिआयपी कल्चर
महाकुंभात अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी कल्चर आणि व्हीआयपींनी स्वतःहून केलेले प्रचार यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सभास्थळी व्हीआयपी कल्चरवर बंदी घालण्याची मागणीही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर म्हणाले की, “महाकुंभमेळ्यादरम्यान तीर्थराज …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, नदीत स्नान केल्याने गरिबी दूर होते का? अन्न मिळते का ? अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीत केले स्थान
नदीत डुबकी मारल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का, गरिबांच्या पोटाला अन्न मिळणार आहे का असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाला यावेळी केला. मध्य प्रदेशातील महू या गावी जय संविधान-जय बापू-जय भिम या काँग्रेसच्या अभियानात मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, इथे बेरोजगारांना …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, मोहन भागवत १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्याचे नाकारतायत राम मंदिरातील मुर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी भारताला खरं स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य केले
मागील वर्षी वादग्रस्त बाबरी मस्जिदच्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यात आली. तसेच लोकसभा निवडणूकीच्या काळात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करताना राष्ट्रीय स्वंयसेवर संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार …
Read More »काँग्रेसची केंद्राकडे मागणी, डॉ मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अत्यंविधीसाठी वेगळी जागा द्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय केंद्र सरकारला लिहिले पत्र
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यविधी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर, जिथे अनेक माजी पंतप्रधानांचे स्मारक आहेत, तेथे वेगळी जमिन मिळावी यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहीत मागणी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सूत्रांनी सांगितले. …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वादः सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य
विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …
Read More »राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब
लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …
Read More »
Marathi e-Batmya