विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ५७९, ठाणे …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, पोलीस महासंचालक संजय वर्मांची नियुक्ती ‘तात्पुरती नियुक्ती’ कशी? २४ तासाच्या आत संजय वर्मांच्या परमनंट नियुक्तीचा आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …संविधान वाचवणे भाजपा, फडणवीसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने भाजपा घाबरली, भाजपाच्या शक्ती स्थळाजवळच कार्यक्रम घेतल्याने जळफळाट
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू …
Read More »उद्धव ठाकरे यांनी गल्लीत तरी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा संजय राऊत यांना सवाल
कोल्हापूर येथील महायुतीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा या आव्हानानंतर थयथयाट करणाऱ्या संजय राऊत यांनी त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांनी कधी गल्लीत तरी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती का,याचे उत्तर द्यावे अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, …हिंमत नसल्याने आरएसएसचा संविधानावर लपून हल्ला जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा …
Read More »वंचित बहुजन आघाडीकडून जोशाबा समतापत्र प्रकाशित जोशाबा समतापत्र असे जाहीरनाम्याचे नाव
जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” – वंचित बहुजन आघाडीचा २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे – • धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे! • बोगस आदिवासींचे दाखले रद्द …
Read More »मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत BKC मधील सभेत मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी काँग्रेसच्या ‘गॅरंटी’ जाहीर करणार.
काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज ४ हजार १४० अंतिम उमेदवार रिंगणात मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची माहिती
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या ४ हजार १४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व …
Read More »निवडणूक मुख्याधिकारी यांची स्पष्टोक्ती, कोणत्या पदावर कोणाला ठेवायचे याचे अधिकार आयोगाकडे शरद पवार यांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे आदेश, सर्व गाड्या तपासा
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सरकारी पोलिसी वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राज्यातील महायुती सरकारवर केला. त्यासंदर्भात आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले की, त्या आरोपानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वाहने तपासण्याचे …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालू मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न
अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील …
Read More »
Marathi e-Batmya