नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »भाजपाकडून या पाच ते सात आमदारांना विधानसभा निवडणूकीत नारळ राम कदम, पराग शहा, तमिल सेल्वन,भारती लव्हेकर, सनिल राणे रेड झोनमध्ये
विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून मुंबईत आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगण्यात असून मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी पाच ते सात उमेदवारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. …
Read More »प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ
सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …
Read More »बच्चू कडू यांचा सवाल, तुम्ही कसले परिवर्तन आणणार… तिसऱ्या आघाडीचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल
पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल करत तिसऱ्या आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करत परिवर्तनाचा अधिकार महायुतीला नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, आरक्षण टिकवायचं असेल तर ‘वंचित’ च वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या
राजकीय पक्ष आरक्षण काढायला निघाले आहेत. आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणणे. ओबीसींचेही आरक्षण राहील, एससी एसटी यांचेही आरक्षण राहील. क्रिमीलेयर सुद्धा जाईल हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचा साथ द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. …
Read More »राज्यात विधानसभा निवडणूकीत ओबीसी मतांमधील स्पर्धा कोणाच्या पथ्यावर मराठा आणि ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर राजकिय धरिणांकडून प्रश्नचिन्ह
देशाचे पंतप्रधान तथा भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी स्वतःला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी म्हणून जाहिर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गाला आरक्षण देताना आणि आणि अनेक योजना जाहिर करताना नरेंद्र मोदी यांनी सातत्याने ओबीसी मतदारांना जपण्याचे भूमिका स्विकारली. त्यातच महाराष्ट्रातही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. तर त्यांच्या भूमिकेला विरोध …
Read More »विधानसभेच्या मतदार यादीत नाव नोंदणीची १९ ऑक्टोबरपर्यंत संधी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची माहिती
भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव …
Read More »नाना पटोले यांचा टोला, मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’ नाही तर ‘रेट कार्ड’वर बोलावे भाजपा युती सरकारमुळे फक्त ‘लाडका उद्योगपती’ व ‘लाडके कंत्राटदार’च मालामाल; शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल.
कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती ,राष्ट्रवादी महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीसाठी सज्ज विरोधकांना फक्त टीकाटीपण्णी करण्यात आनंद
निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि आताही एकाच टप्प्यात महाराष्ट्राचे मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती अशोक गेहलोत, भूपेश बघेल, चरणजितसिंह चन्नी, सचिन पायलट यांच्याकडे विभागनिहाय जबाबदारी
मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली …
Read More »
Marathi e-Batmya