Tag Archives: १५ ऑगस्ट

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि …

Read More »

महाराष्ट्रातील या तीन पोलीस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ १७ पोलिस अधिकारी ‘पोलीस शौर्य पदक’ व ३९ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक”

पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले. यासह राज्यातील १७ पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना ‘पोलीस शौर्य पदक’ तर …

Read More »

भाजपातर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान १ कोटी घरांवर तिरंगा लावण्याचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै च्या ‘ मन की बात ’ मध्ये ‘हर घर तिरंगा ’अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा ’ अभियानाच्या प्रदेश संयोजक आमदार उमा खापरे …

Read More »

सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करणार: इर्शाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली इर्शाळवाडीला भेट

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला. शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हरणार की जिंकणार मतदार…. मोदीजी देश कसा एकसंध ठेवणार

देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन असून प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची महती सांगत पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हे देखील असा आरोप करत पुढच्या वर्षी …

Read More »

लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०२४ ला मीच पुन्हा भाषण करणार आधी महिलांविषयी विचारधारा बदलण्यासाठी मदत तर आता पुन्हा भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी आशिर्वाद मागितला

गतवर्षी महिलांबद्दल असलेल्या विशिष्ट दृष्टीकोन असलेल्या समुदायाने आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आपली साथ हवी अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी लाल किल्ल्यावरून घातली होती. त्यात आज पुन्हा नव्याने काही गोष्टी समाविष्ट करत पुन्हा एकदा यावेळीही आपला काँग्रेस विरोधाचा आलाप आळवत देशातील परिवार वाद आणि भ्रष्टाचाराच्या …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन,… स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तरी खोटं बोलू नये एवढीच अपेक्षा

देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून संविधान व लोकशाही …

Read More »

सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’ १५ ऑगस्ट पासून अंमलबजावणी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची घोषणा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध …

Read More »

१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस जाणार या जिल्ह्यांमध्ये… धनंजय मुंडे आणि धर्मराव आत्राम वगळता राष्ट्रवादीचे बहुतांष मंत्री विदर्भात

देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे महत्व जाणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संबधित पालकमंत्र्याने ध्वजारोहण करावे अशी प्रथा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अद्यापही पुरेशा मंत्र्यांची वाणवा आहे. त्या पार्श्वभूमीवर ३६ जिल्ह्यांपैकी …

Read More »