राज्यातील ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या सर्व समस्या, मागण्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्व रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री भुसे यांनी सांगितले की, रिक्षा चालक बांधवांसाठी राज्य शासनाने यंदाच्या …
Read More »एसटी बस चालक-वाहकांसाठी खुषखबरः रात्रीच्या वस्ती भत्त्यात वाढ होणार बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची- सुधारणासह स्वच्छता करणार-मंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही
महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री भुसे म्हणाले की, एस. टी.च्या …
Read More »शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेनेः विधानभवनाला घालणार घेराव नाशिक ते मुंबई लॉग मार्च, मंत्री दादाजी भुसे भेटणार मोर्चाच्या प्रतिनिधींना
मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच थकित वीजबीलामुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे, त्यातच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ मदत जाहिर करणे अपेक्षित असताना आणि विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार रत्नागिरीच्या जिल्हा आढावा बैठकीत केली घोषणा
कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पेण अर्बन बँकचे पैसे परत करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखा ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम करा
पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे गरीब खातेदार आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे, कोणत्याही परिस्थितीत गरीबांचे पैसे परत मिळाले पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, या जप्त मालमत्तांचा लवकरात-लवकर लिलाव करुन पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील ठेवीदार …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान
राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची केंद्राकडे मागणी, ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करा
महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे झालेल्या कोळसा आणि खनिकर्म …
Read More »नाराज आमदारांशी मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड चर्चा
शिवसेनेशी बंडखोरी करत महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचून एकनाथ शिंदे यांनी राज्यात वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी रोज कोणी ना कोणी ना कोणी या ना त्या कारणास्तव नाराज असल्याच्या चर्चा वारंवार येत आहेत. त्यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाराज …
Read More »दादाजी भुसे यांचे आवाहन, बंदरांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावे
राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी भुसे बोलत होते. …
Read More »
Marathi e-Batmya