Tag Archives: devendra fadnavis

तो व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या; अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना… मविआच्या आमदारांना धमकावणारा शिंदे गटाचा व्हिडीओ ट्वीटरवर केला शेअर

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती विधानसभेत दिली माहिती

राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची …

Read More »

शिंदे गटाचे सुहास कांदे म्हणाले फडणवीस यांना, आम्ही त्या गोष्टीसाठी तुमच्यासोबत आलो अन… विधानसभेतच धरला आग्रह, भुजबळांची केस रिओपन करा

विधानसभेत एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री (छगन भुजबळ) यांनी घोटाळा केल्याचे आरोपपत्रात लिहिलेले असतानाही आणि त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याविषयीचा पत्रक काढलेले असतानाही त्या मंत्र्याच्या विरोधात अपील का केले नाही? असा सवाल करत त्या मंत्र्यांच्या विरोधात अपील करणार असे जाहिर …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत ‘या’ मागणीवरून विरोधी पक्षाचा सभात्याग… महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्यांकडे सरकारने केले दुर्लक्ष...

शिंदे-फडणवीस सरकारने आज ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता…शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यायला हवी होती याशिवाय इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करत असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभात्याग केला. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र …

Read More »

भाषणात व्यत्यय आणण्यावरून जयंत पाटील आणि विधानसभाध्यक्षामध्ये खडाजंगी आपण सत्तारूढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भास आम्हाला होतोय

विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर राईट रिप्लाय अंतर्गत अजित पवार हे बोलायला उभे राहीले. मात्र मध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना थांबवित त्या घटनेची माहिती देवू लागले. त्यामुळे लोकशाही संकेताचे हे सरळसरळ उल्लंघन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगत जे काही बोलायचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, आम्हाला इशारे देताय… तुम्ही मदत केलीय म्हणता पण उस्मानाबादच्या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांनाच तुमच्या चिठ्या काढेन असा गर्भित इशारा दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार करत चांगलेच सुनावले. तसेच शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या मदतीवरून विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहाजवळ उस्मानाबादच्या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येवरून …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुंडेवर पलटवार, तुमचा प्रवास माहित आहे ना…. विरोधकांनाही दिले सडेतोड उत्तर

नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकावर बोलताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धंनजय मुंडे यांनीही खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला, ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये थेट निवडणूकीतून नगराध्यक्ष निवडीवरून साधला निशाणा

विधानसभेतील पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगलं असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत, यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, कमी कालावधीत मत परिवर्तन कसे होऊ शकते? थेट नगराध्यक्ष निवडीवर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांचा आक्षेप...

एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, हायवे समस्यांवर काही ठोस धोरण आहे का ? खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात

महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे …

Read More »