काही वर्षांपूर्वी इंदौरचे अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज हे ही एका हमी ट्रॅपमध्ये आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची बाब कालांतराने उघडकीस आली. त्यानंतर अगदी तशीच घटना कर्नाटकात घडल्याचे सांगण्यात येत असून ४५ वर्षीय लिंगायत साधू बसवलिंगा स्वामी यांनी ही याच प्रकारातून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आले आहे. कर्नाटकमधील ४५ वर्षीय लिंगायत साधू …
Read More »हिजाब बंदीः न्यायाधीशांचा विभागून निकाल, प्रकरण मोठ्या पीठाकडे एक न्यायाधीश म्हणतात याचिकेवर सुनावणी घेण्याची गरज नाही तर दुसरे म्हणतात मुलींचे शिक्षण महत्वाचे
शाळा, काँलेजमध्ये मुलींनी हिजाब घालू नये असा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. सरकारचा हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने कायम ठेवला. या निर्णयाच्या विरोधात तेथील मुलींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने एकमेकांच्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे हिजाब बंदी याचिकेवरील सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे …
Read More »भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट, २५०० कोटी रूपयांच्या बदल्यात मला मुख्यमंत्री पदाची ऑफर काँग्रेसकडून चौकशीची मागणी
नवी दिल्लीतील काही लोकांनी २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते असा गौप्यस्फोट कर्नाटकातील विजयपुरा येथील भाजपाचे विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यत्नल यांनी केला. भाजपाच्या आमदाराने …
Read More »बंगळुरू छत्रपतींच्या पुतळा विटंबना प्रकरणी केंद्र सरकारने दुतोंडी भूमिका सोडावी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर शरसंधान
मराठी ई-बातम्या टीम छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक …
Read More »अजित पवारांनी याप्रश्नी थेट पंतप्रधान मोदींना केली विनंती सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावी
मुंबई: प्रतिनिधी सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. मुंबईसह …
Read More »याच ट्विटमुळे भाजपाशासित राज्यात अभिनेत्री कंगना विरोधात गुन्हा दाखल होणार कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना आदेश
बंगलोर : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्या विरोधावर टीका करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने शेतकऱ्यांना लक्ष्य करत ट्विट्द्वारे आंतकवादी असल्याची टीका केली. त्यावर तुमकुरू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता त्यावरील सुणावनी दरम्यान न्यायालयाने कंगना …
Read More »महात्मा फुले जनारोग्य योजनेचा फायदा बेळगावात ही मिळणार आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : प्रतिनिधी सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर …
Read More »पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीप्रश्नी कर्नाटकच्या मंत्र्याशी चर्चा ७ जुलै रोजी दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री भेटणार
मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागात असलेल्या नदीला पूर येवून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे जलसंपदा मंत्र्यांची चर्चा होणार …
Read More »गुजरातच म्हणतेय, चाचणी करत नसल्याने अहमदाबादेत ४० लाख कोरोना रुग्ण भाजपशासित राज्यात कोरोना रुग्णसंख्या दडवली जातेय : सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे अंधार कोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली. गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये …
Read More »बिहार, कर्नाटकपाठोपाठ आता गुजरातचीही नकार घंटा आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले- महसूलमंत्री थोरात
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार विविध राज्यांत स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नसल्याने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे, या प्रकरणात केंद्रसरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश जाहीर करायला हवे अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल अशी चिंता राज्याचे महसूलमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya