राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, निवडणूक आयोगाने मनाची तरी बाळगून राहुल नार्वेकरांवर कारवाई करा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे, ते स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या …
Read More »राहुल नार्वेकर यांचे सरकारला निर्देश, घेतलेला टोल परत द्या ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा
राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, मराठी भाषा कायम अभिजातच • अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन
भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, भायखळ्यातील ‘उर्दू शिक्षण केंद्र’ प्रकरणी बैठक बोलवा सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांना शासनाने बगल दिल्याचा केला आरोप
भायखळा मधील‘उर्दू शिक्षण केंद्र’चा निर्णय संबंधितांची बैठक घेवून करण्यात येईल, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले असतानाही महापालिका आणि पालकमंत्री यांनी ‘उर्दू शिक्षण केंद्रचा भूखंड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देवून विधानसभा अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा अवमान केला असून या प्रकरणी संबंधित लोकप्रतनिधींची बैठक बोलावावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, जल-जंगल-जमीन या तिन्ही घटकांवर आदिवासींचे हक्क देशाच्या मूळ संस्कृतीचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीचा खरा रक्षक आदिवासी समाज
आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन हा दिवस केवळ आदिवासी समाजासाठी नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे.कारण आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या मूळ सांस्कृतिचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनाचा खरा रक्षक आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न …
Read More »महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. …
Read More »धमकीच्या मुद्यावर बोलू न देता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सगळे आमदार माजलेत असे… पडळकर-आव्हाड प्रकरणाच्या पडसादावरील चर्चेत बोलताना व्यक्त केली भूमिका
पडळकर-आव्हाड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत खेद व्यक्त करायला लावला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी या प्रकरणाशी संबधित आमदाराने धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपाच्या सदस्यांनी आव्हाड यांना …
Read More »पडळकर-आव्हाड प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय अधिवेशन काळात अभ्यागंताना प्रवेश बंदी, पडळकर-आव्हाडांना खेद व्यक्त करायला लावला
काल संध्याकाळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधिमंडळाच्या इतिहासतील काळी घटना घडवून आणली. त्यानंतर विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पडळकर-आव्हाड यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. तेव्हा विधान परिषदेतही या प्रश्नी विरोधकांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …
Read More »
Marathi e-Batmya