Breaking News

उद्योग विभागाचा रिन्यु पॉवर सोबत २० हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार

राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, …

Read More »

विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

भाजपाविरोधी ऐक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी …

Read More »

पेन्शनवाढीसाठी अर्ज भरला? नसेल तर लगेच भरा, जाणून घ्या किती पगारावर किती मिळणार निवृत्तीवेतन

जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPFO ​​चे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य राहिल्यास तुमच्याकडे निवृत्तीनंतरही जास्त पेन्शन मिळवण्याचा पर्याय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) ने उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जूनपर्यंत वाढवली आहे. खरं तर जर तुम्ही खासगी नोकरीत असाल आणि तुमचे पैसे भविष्य …

Read More »

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो !

राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व महाराष्ट्रावर …

Read More »

अजित पवार यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील दाव्यानंतर छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी करताना शरद पवारांनी काँग्रेसमधील अनेक मातब्बर मराठा नेत्यांना साथीला घेतलं. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील अशा मुरब्बी नेत्यांसोबतच तरूण नेत्यांचीही पवारांना साथ लाभली. जयंत पाटील आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील ते राजेश टोपे शरद पवारांनी यांसारख्या उमद्या मराठा नेत्यांना ताकद दिली.. पवारांनी घडवलेल्या मराठी नेत्यांची यादी तशी …

Read More »

मान्सून आणखी दोन दिवसांनी मुंबईसह राज्यात जोरात बरसणार

केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला. 21/06: IMD's Rainfall distribution …

Read More »

महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सन २०२२ आणि सन २०२३ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सन २०२२ मध्ये महाराष्ट्रातील १ …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल, बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी त्यांच्याच फोटोवर हातोडा आणि बुलडोझर…

वांद्रे येथील ठाकरे गटाच्या शाखेवर आज मुंबई महानगर पालिकेने आज कारवाई केली आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत ही कारवाई झाल्याचं पालिकेकडून सांगण्यात येतंय. परंतु, यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि मुंबई पालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय हेतूने आणि चिंधी मनाने …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपाचा कुटील डाव

महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यासंदर्भात पत्रकारांशी …

Read More »

राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये उपलब्ध होणार बँकींग सेवा

केंद्राच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक या संकल्पनेच्या धर्तीवर आता राज्यातील ५० हजार रास्त शिधावाटप दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व खाजगी बँका आदी नागरी सेवा पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ, परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक …

Read More »