Breaking News

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, महादृष्टी प्रकल्पाला आशियायी बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज कौशल्य विकासात महाराष्ट्र घेणार उंच भरारी, समाजातील दुर्बल घटकांनाही होणार लाभ

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या छाननी समितीने कौशल्य विकास विभागाच्या महत्वकांक्षी ‘ महादृष्टी ‘ प्रकल्पाला मंजुरी दिली असून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून सुमारे चार हजार कोटींचे अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कौशल विकासात महाराष्ट्र घेणार उंच भरारी घेणार असून समाजातील दुर्बल घटकांनाही याच होणार लाभ असल्याचे प्रतिपादन कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता …

Read More »

दादर येथे भाजपा कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून प्रचंड घोषणाबाजी करत भाजपाच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणा-यांचा भाजपा कार्यालयासमोर फुले उधळून निषेध …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मागणी, चड्डी-बनियान गँगच्या असभ्य गोंधळाबाबत काँग्रेसने जनतेची माफी मागावी भारत मंडपममधील आंदोलनातून काँग्रेस देशद्रोही चेहरा समोर आला

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून जगापुढे भारताचे तंत्रवैभव सादर केले जात असताना भारत मंडपममध्ये युथ काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगने असभ्य गोंधळ घालून भारताची जागतिक स्तरावर नाचक्की केली. हे देशप्रेम नव्हे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशी टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो मत’चा संदेश त्यांनी जनतेला दिला आहे. भाजपा …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त आहे. भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी जनसामान्यांच्या मदतीने हाती घेतलेले हे ईश्वरीय कार्य आहे, असे उद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले. रासायनिक शेती, पर्यावरणीय बदल आरोग्यासाठी घातक असून या अभियानाची कृषि क्षेत्राशी …

Read More »

भारत- ब्राझील दरम्यान होणार २० अब्जहून अधिकचा व्यापार द्विपक्षिय चर्चेत व्यापार वाढविण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, ज्याचा उद्देश जागतिक दक्षिणेतील दोन प्रमुख राष्ट्रांमधील बहुआयामी सहकार्य मजबूत करण्याच्या अनुषंगाने ही चर्चा होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या संबंधांचे वर्णन “विजयी ” भागीदारी असे केले आणि सांगितले की, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन चंद्रपूर महापालिका प्रकरणी माफी मागितली ही बातमी खोडसाळपणा, माझी चूक नाही तर माफी का मागीन?

भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. काल दिल्ली इथे काँग्रेस पक्षश्रेष्ठी बरोबर झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका करार, त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ केंद्र सरकारच्या निर्णयावरून केली टीका

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अमेरिकेने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांचा दाखला देत, भारताने आपली ‘धोरणात्मक स्वायत्तता’ गमावली असून देश अमेरिकेच्या दबावाखाली झुकल्याचे टीका करत मुद्रा मोदी ते मुजरा मोदी” अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला. …

Read More »

रामदास आठवले यांची घोषणा, मुंबईतील तालुका आणि वार्ड कमिटी बरखास्त येत्या ५ एप्रिल पर्यंत नवीन वॉर्ड तालुका कमिटी निवडण्यासाठी निवडणूक घेण्याचे आदेश

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व तालुका आणि वॉर्ड कमिटी बरखास्त करण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाच्या आझाद मैदानातील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली.या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन …

Read More »

पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ७२ वजनी गटातील कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड

अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी केंद्र व राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राज्य – राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती …

Read More »