Breaking News

सर्वोच्च न्यायालयाने सायबर तक्रारीसंदर्भातील रिट पिटीशन फेटाळून लावली एकाच प्राधिकरणाकडे तक्रारी वर्ग करण्याची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने आज (१० जानेवारी) सायबर फसवणुकीचा बळी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक सायबर तक्रारी एकाच प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी रिट याचिका फेटाळून लावली. रिट याचिकेत, याचिकाकर्त्याने असा आरोप केला आहे की त्याच्याविरुद्ध एकाच कारणामुळे तीन सायबर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम २१ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल,… मुंबईकरांच्या आरोग्यासाठी निधी नाही? मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा

बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची १२० कोटी रुपयांची बिले सरकारने थकवल्याने औषध पुरवठा थांबवण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. बीएमसीकडे अथवा राज्य सरकारकडे पैसे नाहीत हे पटणारे नाही. जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पैसा नाही का? असा संतप्त सवाल करत मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ …

Read More »

ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मकर संक्रात आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला निफ्टी २५० अंकानी तर बीएसई ८४० पेक्षा जास्त घसरला

आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाही आणि मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ४७ वर्षानंतर पहिल्यांदाच आलेल्या महाकुंभ मेळाव्याला आज सुरुवात झाली. मात्र शेअर बाजारावर आज दबाव असल्याचे दिसून आले. निफ्टी ५० १.१% किंवा २५० अंकांपेक्षा जास्त घसरून २३,१७२.७० वर पोहोचला. तर बीएसई सेन्सेक्स ८४० अंकांपेक्षा जास्त घसरून ७६,५३५.२४ वर पोहोचला. व्यापक बाजार निर्देशांक, निफ्टी …

Read More »

रोहित पवार यांची टीका, देशमुख कुटुंबियावर आंदोलनाची वेळ येणं हेच दुर्दैवी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनावर व्यक्त केली भूमिका

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच आणि याप्रकरणी राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून राजकीय तडजोड करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा सर्वच क्षेत्रात आहे. त्याच या हत्या प्रकरणातील तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना देण्यात येत नसल्याच्या मागणीवरून संतोष देशमुख यांचे बंधू …

Read More »

चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे …

Read More »

राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ व्यापक जनसंपर्क अभियान

भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून …

Read More »

भारतीय बाजारातून २२ हजार १९४ कोटी एफपीआयने काढून घेतले रूपयाची घसरण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी तणाव

कमकुवत उत्पन्न हंगाम, अमेरिकन डॉलरमध्ये सतत वाढ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील संभाव्य व्यापार तणाव या चिंतांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात भारतीय शेअर बाजारातून २२,१९४ कोटी रुपयांची मोठी रक्कम काढून घेतली आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले, “एफपीआयकडून होणाऱ्या अथक विक्रीचे एकमेव प्रमुख कारण म्हणजे …

Read More »