उच्च न्यायालयाच्या आवारात एकेरी वापराच्या प्लास्टिक बाटल्यांवरील बंदी मागे घेण्याची मागणी वकिलांच्या संघटनेने मुख्य न्यायमूर्तींना पत्रामार्फत केली आहे. बंदीच्या या निर्णयामुळे न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांची, वकिलांची आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याची मागणीही संघटनेने पत्राद्वारे आज केली. प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण आणि कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने …
Read More »महाराष्ट्रात भाजपाचे ऑपरेशन कमळ? चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, अनेक असंतुष्ट लोक आमच्या संपर्कात आहेत
महाविकास आघाडीला (मविआ) दणका देण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. मविआचे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार-आमदार असंतुष्ट आहेत, ते आपल्यासमोर अस्वस्थता व्यक्त करत आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …
Read More »सरकारची न्यायालयात माहिती, बेकायदेशीररीत्या परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
अधिकार नसतानाही बेकायदेशीररीत्या महामार्गांवरील महाकाय जाहिरात फलकांना परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने २६ नोव्हेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय काढला असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अशा फलकांना परवानगी देण्यास मज्जाव केला. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा …
Read More »उच्च न्यायालयाची सूचना, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी शासकीय अतिथीगृहात रूम्स राखून ठेवा सुरक्षेच्या कारणास्तव घर म्हणून या खोल्या राखून ठेवण्याच्या सूचना
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे सुरक्षा धोक्यात आलेल्या जोडप्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असलेली शासकीय अतिथीगृहे सुरक्षित जागा ठरू शकतात. त्यामुळे, या शासकीय अतिथीगृहातील काही खोल्या अशा जोडप्यांसाठी सुरक्षित घर म्हणून राखून ठेवण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. उच्च न्यायालयाच्या द्विसस्यीय खंडपीठाचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शिवकुमार डिगे यांनी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस… रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून, निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले …
Read More »रामदास आठवले यांचे आश्वासन, मुख्यमंत्री फडणवीस यांना परभणीप्रकरणी भेटणार परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह
परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ माधव गाडगीळ यांचे अभिनंदन युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन-पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राचा गौरव
‘पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) …
Read More »अवाढव्य वीज दरावरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल, वीज महाग का? सरकारकडे प्रचंड बहुमत, अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी
राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला घेरले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या विज महाग मिळत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोलाही त्यांनी लगावला …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, संविधानाची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करा: अन्यथा… कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे डॉ प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …
Read More »राज्यघटनेच्या विटंबनेनंतर परभणी बंदला हिंसक वळण दगडफेक आणि टायर जाळण्याचे प्रकार
मंगळवारी अर्थात काल काही समाजकंटकांनी परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण दलित समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर आज परभणी बंद पुकारण्यात आला. मात्र त्यास हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून दुकानांवर आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya