राजकारण

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात २९ जानेवारीपासून आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३०, ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे माजी …

Read More »

स्वबळाची घोषणा केली तरी ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने जरी केली. तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होण्यास आणखी वर्ष दिड वर्षाचा कालावधीचा अवकाश असताना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनी …

Read More »

आदीत्य ठाकरे यांच्यासह शिंदे, खैरे, आडसूळ, गीते यांना बढती मिलिंद नार्वेकर नवे सचिव तर परब, कायदे नवे प्रवक्ते

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेनेनेही नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेते पदी बढती दिली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून …

Read More »

महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेना स्वबळावर भगवा फडकविणार राज्यासह देशभरात निवडणूका लढविण्याची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील काही वर्षे केवळ हिंदू मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर निवडणूका लढवित नव्हती. मात्र यापुढील काळात महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक निवडणूक शिवसेना लढविणार असून त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढवित महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याची घोषणा शिवसेना …

Read More »

सरकारकडून फक्त २५ टक्क्याच्या निधीवर जनतेची बोळवण विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकास कामांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदीप्रमाणे विविध विभागांना राज्य सरकारने आजवर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या ३५ ते ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला नाही. फक्त २५ टक्क्यांच्या निधीवर कल्याणकारी योजना आणि लाभार्थी जनतेची बोळवण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. हे सरकार सातत्याने आर्थिक शिस्तींचे …

Read More »

राज्यातील भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे तर धनिकांचे ‘पतंजली’बाबतचे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची विखे पाटील यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपचे सरकार हे सर्वसामान्यांचे नसून मूठभर धनिकांचे आहे. त्यामुळेच मुठभर धनिकांच्या फायद्यासाठी अर्थात पंतजलीची उत्पादने विकण्यासंदर्भात राज्य सरकारने शासकीय सेवा क्रेंद्रातून उत्पादने विकण्याचा निर्णय घेण्याची कृती हे स्पष्ट दर्शवित असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून, …

Read More »

२०१९ हे वर्ष भाजपच्या घर वापसीचे : खा. अशोक चव्हाण काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराची मनोर पासून सुरुवात

मनोर : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करत हेच वर्ष भाजपच्या घर वापसीचे राहणार असल्याची भविष्यवाणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत केंद्र आणि राज्यातील परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. पालघर जिल्ह्यातील …

Read More »

रस्ते विकासासाठी येत्या मार्चपूर्वी भूसंपादन करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन जलदगतीने करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मलबार हिल येथील सह्याद्री शासकिय निवासस्थानी आयोजित केंद्र शासनाच्या भारतमाला या राज्यातील रस्ते विकासाच्या योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Read More »

मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक संस्था सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत इतर सहकारी संस्थांना थेट तर मागासवर्गीयांच्या संस्थांना बँकेकडून मदतीची अट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी क्षेत्रातील उद्योगांना चालविण्यासाठी आणि त्या उद्योगांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात येते. मात्र मागासवर्गीयांच्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांना थेट मदत देण्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात देवूनही त्यास अद्याप आर्थिक मदत दिली नसल्याने हे उद्योग उभे राहू शकले नाहीत. …

Read More »

राणेंचा आठवले होणार ? मंत्रिपदाच्या मागणीवरून राणेचे मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसमधील थंडा कर के खाव पध्दतीच्या राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वत:चा स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. मात्र आमदारकी आणि मंत्री पदाचे आश्वासन दिलेल्या भाजपकडून यातील एकही अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे आता राणे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा …

Read More »