Tag Archives: भाजपा

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही

सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या पैशाच्या हिशोब जनता विचारणारच, त्याचा एवढा राग येण्याचे काही कारण नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बघून घेण्याची जी भाषा केली ती अत्यंत …

Read More »

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना त्या हिंदीतील वक्तव्यावरून केला सवाल कोणासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतून हिंदीतून भाषण

मिसिंग लिंक तयार होऊन दोन तीन महिने झाले नाही तोच पहिल्याच पाऊसात मिसिंग लिंगमध्ये धबधब्याचे स्वरूप पाह्यला मिळाले. या स्थितीवरून मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सरकारच्या कामावर टीकाही केली. मात्र २९३ च्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांच्या टीकेला प्रतित्त्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, प्रभू रामाच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी? अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच ‘खास’ लोक; रामभक्ताच्या देणग्यांचा हिशोब द्या, काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचा नाशिकच्या काळाराम मंदिरातून शुभारंभ, ९ तारखेपासून राज्यभर सत्याग्रह

अयोध्येमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रभू रामाचे मंदिर बांधण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली. या विश्वस्तांमध्ये भाजपा, आरएसएस व मोदींच्या खास लोकांना नियुक्त केले व या ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून बाहेर ठेवले. जगभरातील कोट्यवधी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रभू राम चरणी दान व देणगीच्या स्वरुपात अब्जावधी रुपये …

Read More »

रामाच्या नावावर देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या भाजपा, आरएसएसच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत उद्या ७ तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरामधून आंदोलनाची सुरुवात

अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराला रामभक्तांनी लाखो करोडो रुपये दान स्वरुपात दिले. सोने चांदीचे दागिने दिले पण भक्तांनी दिलेल्या दान व देणग्यांवर भाजपा व रा. स्व. संघाच्या लबाड बगलबच्चांनी दरोडा टाकला आहे. हा केवळ पैसे अथवा देणग्यांवर टाकलेला दरोडा नसून श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवरच टाकलेला दरोडा आहे. रामाला लुटणाऱ्या भाजपा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये ‘पाण्यात’; मुंबईची ‘वाताहत’ होण्यास भाजपाच जबाबदार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून …

Read More »

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यत पसरला आहे?

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय? असा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बीडमधील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहाराचे ७३ कोटी वसूल करणार भूसंपादनाच्या नावाखाली अवैधरित्या रकमेचे वितरण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरीत करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाच्या ‘मावेजा’ वाटपात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये मनमोहन सिंग आणि शरद पवार यांनी तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं. त्यावेळी राज्यतील तब्ब्ल ४२ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला …

Read More »

विधान भवनात मंत्री, आमदारासाठी मुतारी, तिथे जनतेला मुतायची चोरी पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या प्रशासनाकडून आदेश जारी

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास कालपासून सुरुवातल झाली. काल पहिला दिवस असल्याने विधान भवनाच्या प्रशासनाने कामकाज कमी असल्याने फारसे तगडी सुरक्षा आणि इतर बाबीकडे थोडेसे दुर्लक्ष केले. मात्र आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र विधान भवन प्रशासनाने मात्र चांगलीच सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचे दृष्य आमदार आणि मंत्र्याच्या लॉबीसमोर असलेल्या मुतारीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, विधान परिषद निकालात सत्ताधारी महायुतीकडून साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर आजचे निकाल ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचा सत्तेचा उन्माद दिसून आला. जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस, प्रमाणे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला. लोकशाही नाही तर ठोकशाही पद्धतीचे चित्र या निवडणुकीत दिसले. बळी तो कान पिळी प्रमाणे भाजपाची भूमिका असून आता …

Read More »