Tag Archives: भाजपा

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा शासन लवकरच घेणार दिलासादायक निर्णय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार

राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांवर …

Read More »

नितेश राणे यांची माहिती, आंबा-काजू उत्पादक, मच्छीमारांसाठी वाढदिवस साजरा करणार नाही पाऊस लांबला, पाणीटंचाई

कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय जुहू बीचवरील फूड कोर्टजवळ आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले वक्तव्य

जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

चारच महिन्यात ४ थ्या अर्थव्यस्थेचा नंबर गमावला, ट्रम्पकडून अपमान तरीही पियुष गोयल यांचा दावा सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चवथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेचा नंबर मिळविल्याचा डोगोंरा पिटला. मात्र तो नंबर चारच महिन्यात गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनकडून भारतात येणाऱ्या आयात मालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत चीम मध्ये होणारी भारताची निर्यात अत्यंत कमी आहे. तसेच …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे उत्तर, ३० वर्षे भाजपासोबत राहून शिवसेना विसर्जित केली नाही.. तर शिवसेना उबाठा पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिंदे शिवसेनेला दिले प्रतित्तुर

शिवसेना पक्षाला ६० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित वर्धापन दिना निमित्त मांटुगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे शिवसेनेकडून शिवसेना उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना …

Read More »

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात जुंपली दक्षिण-उत्तर भारत च्या विभाजना वरून टीका

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर उत्तर-दक्षिण विभाजनाला खतपाणी घातल्याचा आरोप करत जोरदार टीका केली. रेवंत रेड्डी यांना देशाचे विभाजन न करण्याचे आवाहन केले आणि प्रदेश कोणताही असो, प्रत्येकजण भारतीय आहे, असे ठामपणे सांगितले. एका व्हायरल व्हिडिओवर रिजिजू प्रतिक्रिया देत होते, ज्यामध्ये रेवंत रेड्डी यांनी …

Read More »

घरगुती गॅसच्या किंमतीत २९ रुपयांनी वाढ तीन महिन्यातील ही दुसरी दरवाढ

भारतात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत आजपासून प्रति सिलिंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर वाढलेले ऊर्जेचे दर पेलणे सरकारी तेल कंपन्यांना कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, दारू दुर्घटनासंदर्भातील मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागाचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी

पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, या समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील …

Read More »

शिवेंद्रराजे भोसले यांचे निर्देश, एअर इंडिया इमारतीची संरचनात्मक तपासणी करा १५ ऑगस्टपासून इमारत वापरात आणण्याचे नियोजन

एअर इंडियाच्या  इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल  संरचनात्मक तपासणी करण्यात यावी.  तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच अंतर्गत सजावट आणि  इतर विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दिले. एअर इंडिया इमारतीची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करून इमारत येत्या १५ ऑगस्टपासून वापरत आणण्याचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कर्जमाफी निव्वळ धुळफेक, ५० % पेक्षा जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार फडणवीस सरकारने आधी ८० लाख लाडक्या बहिणींना निकष लावून अपात्र ठरवले, आता शेतकऱ्यांचीही नियम लावून घोर फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना हा निव्वळ देखावा आहे. या योजनेमध्ये शब्दच्छल करून नियम, अटी व शर्ती टाकून जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेतून जाणीवपूर्वक बाहेर ठेवलेले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असून सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »