नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर …
Read More »शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार
शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत प्रथेप्रमाणे राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे शिवसेना उबाठाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. नागपूरात उद्या सोमवारपासून …
Read More »महाराष्ट्रातील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उबाठा स्वबळावर? स्वबळावर निवडणूका लढविण्याची भूमिका
केंद्रात स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या राजकिय भूमिकेच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत चांगल्यापैकी यश मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पराभवाची नामुष्की स्विकारावी लागली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाकडून …
Read More »आदित्य ठाकरे यांचे आश्वासन, क्लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी रद्द करणार पुण्यात कोणत्या झाडीतला पैसा सापडला ? निवडणूक आयोग तटस्थ आहे की नाही आता कळेल
कोळीवाड्यातील शासनाच्या ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी बद्दल राज्य सरकारला धारेवर धरत ही पॉलिसी कोळी बांधवांसाठी अन्यायकारक असून आमचं सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी ही पॉलिसी तात्काळ रद्द करणार असल्याचं आश्वासन शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलं. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांची आज मातोश्री येथे पत्रकार परिषद पार …
Read More »नाना पटोले यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची नाराजी तर नाना पटोले म्हणाले ते मोठे… अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्यावर केला पलटवार
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक आयाराम गयारामांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडली आहे. आज सांगोल्याचे दिपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, लाडक्या बहिणींसाठी इव्हेंट.. राज्यपालांना पत्र पत्र लिहून चौकशीची केली मागणी
राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनाम्यासाठी शिंदे सरकारकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करत सुजाता सौनिक यांचे पती (मनोज सौनिक) यांच्यावर खोटी कारवाई करुन अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांनी करत याप्रश्नी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यां पत्र लिहित सनदी …
Read More »शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे …
Read More »अंबादास दानवे म्हणाले, लाडक्या बहिणी पेक्षा सुरक्षित बहीण हवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात “लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी” या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक डॉ. …
Read More »अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करतोय सरकारचं कृषीधोरण शेतकरी विरोधी
दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. केंद्र व राज्य सरकारचं धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे. सरकारचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशी प्रेम असून सरकारच कृषीविषयक धोरण शेतकरी विरोधी …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची गद्दार, लाचारांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ द्यायची नाही
राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya