भारतीय जनता पक्ष, शिंदे सरकारचे शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने जेवढे लुटता येईल तेवढे लुटण्याचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सुरु आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढले असून पाच दिवसांत हे ९० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री
मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …
Read More »नाना पटोले यांची टीका, मोदी-शाहांनी लुटले, काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ लुटीची माहिती… मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राला …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, परिस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येणार लाडकी बहिण योजना केवळ निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी
हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता तयार आहे. राज्यातील जनतेचे समर्थन महाविकास आघाडीला मिळून मविआचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त …
Read More »निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, दुसरी सलामी महाराष्ट्राची देणार हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार-चंद्रशेखर बावनकुळे
हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयाबाहेर आज विजयी मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत मिठाई वाटण्यात आले. हरियाणात अपेक्षा नसतानाही भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी ठरली. मात्र हरियाणातील भाजपाचा फॉम्युला जम्मू आणि काश्मीर राज्यात यशस्वी ठरू …
Read More »जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचः एनसी+काँग्रेस आघाडीवर, पीडीपी ३ जागांवर भाजपाने जम्मूत खाते उघडले
नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने मिळविलेली आघाडी दुपारपर्यंत कायम राखली. जम्मू आणि काश्मीरमधील एकूण ९० जागांपैकी ५२ जागांवर नॅनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने जवळपास ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स ४३ …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला स्मरणपत्र रश्मी शुक्लांची मुदतवाद विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा पोहचणारी
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उच्च पदावर असलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करतात, अशा पक्षपाती अधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडतील याबाबत शंका असल्याने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी पुनश्च मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, दोन धारावी बनवण्याचा भाजपा सरकारचा इरादा… धारावीकरांना मिठागरे व डंपींग ग्राऊंडच्या जमिनीवर हाकलण्याचे षडयंत्र
धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीकरांना विस्थापित करून अदानीचे टॉवर उभे करण्याचा भाजपा-शिंदे सरकारचा प्रयत्न आहे. धारावीकरांचा तीव्र विरोध असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भाजपा सरकारने अपात्र लोकांना भाडेतत्वावरील घरे देण्याचा जीआर काढला असून दोन धारावी करण्याचा सरकारचा इरादा असून एक अदानीसाठी व दुसरी गरीबांसाठी, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार …
Read More »नाना पटोले यांचा खोचक सवाल, …भाजपा आणि देवेंद्र फडणवीस कधी मागणार? डिसकव्हरी ऑफ इंडियाबाबत भाजपाकडून सातत्याने खोटे बोलून अपप्रचार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर राहुल गांधी यांनी आयर्न लेडी इंदिरा गांधींच्या नावाने राजकारणात महिला सशक्तीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. इंदिरा गांधी फेलोशिपअंतर्गत महिला सशक्तीकरणासाठी ‘शक्ती अभियान’ सुरु करण्यात आले असून महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात आजपासून करण्यात येत असल्याची माहिती …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, … १० हजार लोकांवर बेरोजगारी मच्छिमार व्यवसायिकांच्या प्रश्नी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
ससून डॉक येथे १०० वर्षांपासून सुरु असलेल्या फिशिंग बोटींचे काम नवी मुंबईतील उरण कारंजा येथे हलवल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जवळपास १० हजार लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणे अन्यायकारक आहे. सरकारने ससून डॉकमध्ये मच्छिमारी व्यवसाय करणारे व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने …
Read More »
Marathi e-Batmya