सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले की, योग्य वर्गखोल्या, बाक, शौचालये आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडले जात आहे. लातूरमधील एका जिल्हा परिषद शाळेला भेट देताना …
Read More »शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी …
Read More »दादा भुसे म्हणाले, टीईटी-२०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी भविष्यातील परीक्षा पारदर्शक होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत निवेदनाद्वारे …
Read More »दादा भुसे यांची माहिती, मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द कारवाई राज्यात मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, मराठी भाषा …
Read More »असर च्या अहवालाला राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे उत्तर राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध
असर अर्थात प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण ७२.९५ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत महाराष्ट्र क्रमांक एकवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न
राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार… वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य
वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या अभिष्टचिंतन, पुरस्कार प्रदान आणि वारकरी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी …
Read More »नाना पटोले यांचा इशारा,… महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत
शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्विकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब करु नका असे आवाहन करत राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. प्रदेश काँग्रेसची आढावा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत व्हावे. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करा, …
Read More »
Marathi e-Batmya