Tag Archives: दिल्ली

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनः मराठी भाषेची वैशिष्ट्य विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे  साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना …

Read More »

दिल्ली मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि ह्या नेत्याची निवड होण्याची शक्यता तीन जणांची नावे चर्चेत पंतप्रधान मोदी, अमित शाह ठरवणार मुख्यमंत्री

दिल्लीत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे, कारण भाजपा २७ वर्षांनंतर राजधानीत सरकार स्थापन करणार आहे, असे सूत्रांनी रविवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यापूर्वी पक्ष त्यांच्या आमदारांची बैठक घेण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी आज आधी सांगितले की भाजपाने सोमवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. …

Read More »

दी दी दिल्ली वाली प्यारी दीदीः सत्तेत कोण बसणार महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती दिल्लीत होणार की.....

आता दिल्लीची दिदी प्रसिद्धीला येऊ लागली आहे. प्रिय दिदीचा प्रिय भाऊ कोण होणार याचे रहस्य ८ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनमधून बाहेर येणाऱ्या जादूच्या आकृत्यांना उघडेल. ५ फेब्रुवारीला ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचे मन गोळा झाले आहे, जे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दिदीनीही आपले मत मांडले आहे. परिणाम येईपर्यंत, भावांच्या हृदयाचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे सांगितले. दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणारे साहित्य संमेलन यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्याची झलक कर्तव्य पथवरः विविध राज्यांच्या रथांनी मने जिंकली कार्यक्रमाला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवताना, १६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या रथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. आंध्र प्रदेशच्या रथाची थीम ‘एतिकोप्पका बोम्मलू’ होती, ज्यामध्ये पर्यावरणपूरक लाकडी खेळणी होती. उत्तर प्रदेशने महाकुंभाचे रथाची थीम तयार केली. तर पश्चिम बंगालने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकणारे “लक्ष्मी भंडार” आणि …

Read More »

दिल्लीतील राड्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला तोडफोड सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक

दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या …

Read More »

८५ व्या वर्षाच्या तरूणाने दिल्लीच्या वर्तुळात पुन्हा आणले चर्चांचे उधाण निवडणूकीत कमी जागा मिळाल्या तरी राजकीय महत्व दाखविण्यात यश

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शरद पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला निवडणूकीच्या रणांगणात मोठे महत्व नेहमीच रहात आले आहे. मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिनाच्या दिवशी नेहमीच बारामती किंवा मुंबईत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार उलथवून महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शरद पवार यांनी …

Read More »

नवाब मलिक यांच्या उमेदवारी प्रकरणी अजित पवार दिल्लीतील भाजपाकडे करणार शिष्टाई भाजपा नेत्यांचा विरोध दूर करण्यासाठी करणार चर्चा

नवीन कुमार महाराष्ट्र भाजपाचा विरोध असतानाही अजित पवार आता दिल्लीतील भाजपा नेत्यांशी नवाब मलिक प्रकरणी आणि उमेदवारी देण्याबाबत शिष्टाई करणार असल्याची माहिती पुढे येत असून नवाब मलिक यांच्या प्रकरणात ज्युनियर पवार झुकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अधिकृत सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लिम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला यश नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे

राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी करत याभागात भिती आणि दहशतीवर …

Read More »

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ तारा भवाळकर यांची निवड तब्बल सात दशकानंतर सहाव्या महिला ठरल्या

नेहमीच मराठी चोखंदळ वाचकांसाठी आणि वैशिष्यपूर्ण लेखनाची अभिजात गोडी ज्यांच्या लेखनात असते अशा मान्यवर लेखकांचा मेळा ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी यंदा डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या डॉ तारा भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. यंदाचे साहित्य …

Read More »