बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीशी संबंधित दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांच्या आणि कथित चकमकीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या परिच्छेदाला ठाणे सत्र न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. त्यामुळे, अक्षयच्या चकमकीसाठी जबाबदार ठरवलेल्या पोलिसांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. अक्षयच्या चकमकीचा चौकशी अहवाल दंडाधिकाऱ्यांनी २० जानेवारी रोजी उच्च न्यायालयात …
Read More »सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा सरकारने न्याय दिला नाही तर लाखो आंबेडकरी जनतेचा ३ मार्चला मंत्रालयाला घेराव
परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर …
Read More »मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आरोप, निवडणूक आयोगाला भाजपावाल्यांचे कृत्य दिसत नाही
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली पोलिसांचे अधिकारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील कपूरथला येथील घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत. “भाजपावाले दिवसाढवळ्या पैसे, चपला, चादरी वाटत आहेत – ते दिसत नाही. त्याऐवजी ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकायला जातात. व्वा भाजपा! दिल्लीची जनता ५ तारखेला उत्तर …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे मोठे वक्तव्य, बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या हातात बेड्या असताना पोलिसांच्या खिशातून रिव्हॉलर कोण काढणार
बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अक्षय शिंदे याला खोट्या चकमकीत पोलिसांनी हत्या केली असल्याचा ठपका, दंडाधिकाऱ्यांच्या अहवाल ठेवण्यात आला आहे. तसेच हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयानेही स्विकारला आहे. तसेच या चकमकीत पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यातच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …
Read More »सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यास अटकः म्हणे तो बांग्लादेशीः ५ दिवसांची पोलिस कोठडी हल्ला करणाऱ्यास ठाणे येथील कासारवडवली येथून अटक
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर सैफ अली खान आणि सदर आरोपीची झटापट झाली. या झटापटीत सैफ अली खान यांच्यावर ६ चाकूचे वार झाले त्यामुळे जखमी झालेल्या सैफ अली खान याला मध्यरात्रीच रूग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात झालेला जिवघेणा हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे. वांद्र्यासारख्या भागात अशा प्रकारची ही तिसरी घटना घडलेली आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील हल्ला. सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे …
Read More »उच्च न्यायालयाने पत्नीचा विनयभंग केल्याचा गुन्हा रद्द करण्यास दिला नकार प्रकरण प्राथमिक टप्प्यात असल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण
पतीपासून विभक्त होवू पाहणाऱ्या पत्नीचा विनयभंग केल्याबद्दल पतीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी रिट याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळताना सांगितले की, प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असून पुराव्यांचे मूल्यांकन करणे हे न्यायालयाचे काम नाही. …
Read More »जितेंद्र आव्हाड यांची टीका,… वाल्मिक कराडने पोलिसांनाच बिळात घातले सोमनाथ सुर्यवंशी यांचा खून झाला, परभणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु
गुंडांना जात नसते, गुंडांना फक्त आपला स्वार्थ दिसत असतो. वाल्मिक कराडने सीआयडीसमोर येण्यापूर्वी एक व्हिडिओ रिलीज केला होता. तो शरण येणार हे माहित असून देखील पोलिसांनी नाकाबंदी केली नाही. आज पूर्ण देशात आपल्या पोलिसांची नाचक्की झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी …
Read More »अभिनेता अल्लू अर्जूनची चिकडपल्ली पोलिसांकडून ४ तास चौकशी जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले
तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या ‘पुष्पा २: द राइज’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सुमारे चार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, जामिनावर बाहेर असलेल्या अर्जुनने सांगितले की, त्याला दुसऱ्या दिवशी महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. अल्लू अर्जुन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …
Read More »दिल्लीतील राड्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला तोडफोड सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक
दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या …
Read More »
Marathi e-Batmya